लातूर : दहावी, बारावीच्या परीक्षेत गेल्या अनेक वर्षांपासून लातूरने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून यावर्षी दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण घेणारे राज्यातील १५१ विद्यार्थ्यांपैकी लातूर विभागातून तब्बल १०८ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळविले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक निकाल लागला मात्र शंभर पैकी शंभर गुण घेणारे कोकण विभागात केवळ तीन विद्यार्थी आहेत. पुणे विभागात पाच, औरंगाबाद विभागात २२, मुंबई विभागात सहा, अमरावती विभागात सात तर लातूर विभागात तब्बल १०८ विद्यार्थी आहेत.मराठवाडय़ात लातूर व औरंगाबाद हे दोन विभाग आहेत. या दोन विभागातच १५१ पैकी १३० विद्यार्थी १०० पैकी शंभर गुण मिळविणारे आहेत. लातूर जिल्ह्यातच गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध परिश्रम घेतले जातात त्यात शाळा सुटल्यानंतर शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यास वर्ग घेणे, नववीची परीक्षा लवकर संपून उन्हाळय़ाच्या सुट्टीतच दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Among the 151 hundred students in the state 108 students from latur mandal amy
First published on: 03-06-2023 at 03:30 IST