एकीकडे राष्ट्रीय पातळीवर पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काय लागणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षातील फुटीचा मुद्दा तापला आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी चालू असताना निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये मंत्री छगन भुजबळांनी थेट शरद पवारांवर शरसंधान केलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

यावेळी बोलताना छगन भुजबळांनी १९९९ साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचं विधान केलं. “आपला पक्ष नवीन नाही, जुना आहे. १९९९ साली स्थापन झालेला पक्ष हाच आहे. याच पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ होता”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Dharmarao Baba Atram, Ajit Pawar Group, Lok Sabha Elections, Assembly Elections, Maha vikas Aghadi, Ladaki Bahin Yojana, BJP, Private Meetings, Shivaji Maharaj Statue
राष्ट्रवादीचे मंत्री आत्राम म्हणतात “ही माझी शेवटची निवडणूक, यानंतर …”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….
sanjay shirsat replied to uddhav thackeray
Sanjay Shirsat : “…तर मुख्यमंत्रीही विकृत आहेत”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसच्या मांडीवर बसून…”
MP Praniti Shinde says Opposition leader is our Chief Minister
चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’
ajit pawar ladki bahin yojana latest marathi news
पिंपरी : “मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की…”, अजित पवार म्हणाले, “आजचा दिवस…”

“एवढी चिडचिड का चाललीये हे काही मला कळलं नाही. सगळेच इकडे आले तर आम्ही काय करायचं? तुमचंही तेच तर चाललं होतं. २००४ सालीही तुमचं तेच चाललं होतं. तेव्हापासून चालूच आहे ना? यातल्या काही गोष्टी प्रफुल्ल पटेलांना माहिती आहेत. मला फार थोड्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा माहिती झालं, तेव्हा वाटलं की तळ्यात-मळ्यात करण्याऐवजी एकदाचा काय तो निर्णय घ्या”, अशा शब्दांत भुजबळांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला.

“जयंत पाटलांनी विचारलं आणि साहेब म्हणाले…”

“५४ आमदार आणि खासदारांनीही भाजपाबरोबर सरकार स्थापनेसंदर्भातील कागदावर सह्या केल्या. सगळी मंडळी जात होती. जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल विमानात तयार बसले होते. पण जयंत पाटलांना वाटलं की परत विचारायला जावं. पण मग साहेब म्हणाले थांबा, नका बसू विमानात. शिवाय हे एकदा झालेलं नाही. अनेकदा झालंय. तुम्ही एखाद्या पक्षाला एकदा हो म्हणून सांगितलं आणि नंतर तुम्ही मागे सरलात तर ते एकदा ठीक आहे. पण प्रत्येक वेळी तेच तेच घडतंय”, असा आरोपही त्यांनी शरद पवारांवर केला.

“…तर छगन भुजबळ मुख्यमंत्री बनतील”, मराठा-ओबीसी वादावर बच्चू कडूंचं सूचक विधान

“तुमची अडचण काय आहे?”

दरम्यान, आपण भाजपाबरोबर गेल्यामुळे अडचण काय झाली? असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना केला आहे. “आम्ही काय आमचा पक्ष सोडलाय का? आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अडचण काय आहे? म्हणे मार्ग बदलला. नितीश कुमार भाजपाबरोबर जाऊन आले. काय झालं? आहेत तिथेच आहेत. जयललिता, नवीन पटनायक, मेहबुबा मुफ्तीही गेल्या होत्या. मग त्यांची विचारधारा बदलली का? आम्हीही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सरकारमध्ये गेलो. त्याआधी आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का? नाही. तसं म्हटलं तर शिवसेना आणि भाजपा विचारधारा सारखीच आहे. मग तिकडे गेलं तर चालतं आणि इकडे गेलं तर चालत नाही असं कसं?” असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही सगळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारमध्ये गेलो आहोत. सत्ता काय, आम्ही अनेकदा मंत्री झालो आहोत. त्यात काय आहे? पण जनतेच अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायला आम्ही गेलो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेनं आपल्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. तारीख पे तारीख चलता है. न्याय आपल्या बाजूनेच होईल”, असंही ते म्हणाले.