सांगली : पलुस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील समर्थ अंबाजी बुवा घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त सोमवारी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने गेला आठवडाभर गावातील सेवाभावी तरुणांकडून घाटाची स्वच्छता मोहीम सुरू आहे. सायंकाळी या घाटावर रांगोळी काढून शेकडो दिव्यांनी घाट उजळून निघाला.

या दिपोत्सव कार्यक्रमाचे हे तेवीसावे वर्ष असून गावातील तरुणाई या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. आकर्षक रांगोळी, दिव्यांनी उजळलेला घाट यावेळच्या दिपोत्सवाचे प्रमुख आकर्षक ठरले. यानिमित्ताने कृष्णामाईची महाआरती करण्यात आली. भगवान शंकराने तिन्ही नगरे जाळून त्रिपुरासूर राक्षसाला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

PM Narendra Modi inaugurated Nangara Vastu Museum at Pohradevi Washim district on Saturday
पंतप्रधान मोदींनी घेतला नगारा वाजवण्याचा आनंद; वाशीमच्या पोहरादेवी येथे…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री
Bhandara, Skeleton woman, Dandegaon Jungle area,
भंडारा : दांडेगाव जंगल शिवारात अज्ञात महिलेचा सांगाडा; विविध तर्क वितर्कांना उधाण
Gold prices decreased on Wednesday after Ganeshotsav
सुवर्णवार्ता… गणेशोत्सव संपताच सोन्याच्या दरात घसरण.. हे आहेत आजचे दर…
young man visiting Srikshetra Olandeshwar swept away in Panganga River found dead after 20 hours
बुलढाणा : महादेवाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण पैनगंगेत बुडाला; तब्बल २० तासांनंतर…
Shri Barabhai Ganapati,is famous throughout state including Vidarbha ancient tradition,this Ganpati was preserved by Nath family and Akolekar
अकोल्यातील श्री बाराभाई गणपतीची १३४ हून अधिक वर्षांची परंपरा

हेही वाचा – “शरद पवार हे मार्केटमधलं एक नंबरचं नाणं म्हणूनच…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – “कुणबी दाखले योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार कोणाला?”, हसन मुश्रीफांचा छगन भुजबळांना घरचा आहेर

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्याचबरोबर मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याच्या शहीदांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने कृष्णा काठावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. शहीद अशोक कामटे, हेमंत करकरे, उन्निकृष्णन, तुकाराम ओंबळे आणि अन्य हुतात्म्यांना या ठिकाणी दीपोत्सव साजरा करून श्रद्धांजली वाहण्यात आली.