लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : कोट्यावधी खर्चाची नवीन योजना अंमलात आणण्याऐवजी कृष्णेतील पाण्यावर अद्यावत शुध्दीकरण प्रकल्प बसवून सांगलीकरांना शुध्द व मुबलक पाणी देण्याचा महापालिका कसोशीने प्रयत्न करत असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

ulhasnagar municipal corporation,junior clerk registered case against additional commissioner
उल्हासनगर पालिका अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा, जाहिरात घोटाळ्यातील कारवाई रोखण्याचा प्रयत्नाचा अधिकाऱ्याचा आरोप
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : खरगे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप; सिद्धरामय्यांनंतर मल्लिकार्जुन खरगेंना घेरण्याचा प्रयत्न?
Shambhuraj Desai, Badlapur, Badlapur school case,
…अखेर पालकमंत्री शंभूराज देसाई बदलापूरमध्ये येणार, आदर्श शिक्षण संस्थेची घेणार भेट
namo shetkari mahasamman yojana marathi news
महिलांपाठोपाठ शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न, सव्वा कोटी लाभार्थींना महासन्मान योजनेचा चौथा हप्ता
IAS Shubham Gupta, woman homeless,
IAS Shubham Gupta : आयएएस शुभम गुप्ता यांचा आणखी एक प्रताप; महिलेला बेघर केले, खोट्या गुन्ह्यातही गोवले
Chhagan Bhujbal , Nar-Par ,
Chhagan Bhujbal : नार-पारविषयी माझी भूमिका हा योग्य पर्याय – छगन भुजबळ यांचा दावा
water supply complaints, water Mumbai,
पाणीपुरवठ्याच्या तक्रारी तातडीने निवारण करा, मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

आज महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सर्व सामान्य नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्न बाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली आहे. त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे भावनिक आवाहन केले. ५६ एमएलडी प्रकल्प अद्यावत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

आणखी वाचा-“मी असताना राज ठाकरेंची गरज काय?” मनसेला महायुतीत घेण्यावरून रामदास आठवलेंचा सवाल

यावेळी नागरीक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी पाणी पुरवठा योजनेतील त्रुटीबाबत वारंवार निवेदन दिली, मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. विभागाकडील कर्मचारी योग्य काम करतात का, पाणी मीटर बंद असल्यावर दुप्पट पाणी बिल आकारणीचा निर्णय घेतला, मात्र बोगस नळजोडणी शोधली आहे का, गळती नेमकी कुठे होते याची पडताळणी का केली जात नाही अशी विचारणा केली.

उपायुक्त वैभव साबळे यांनी सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिली. बैठकीस उपायुक्त पंडित पाटील, पृथ्वीराज पवार, रोहिणी पाटील, उर्मिला बेलवलकर, विष्णू माने, हणमंतराव पवार, पद्माकर जगदाळे, आनंदा लेंगरे, जयश्री पाटील, उत्तम कांबळे, सुजित काटे, सर्जेराव पाटील, मयूर घोडके, माधुरी वसगडेकर, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.