महापुरामुळे महाड शहरात चिखल आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील कचरा उचलण्यासाठी मोहीम राबिविण्यात येत आहे. शनिवारपर्यंत तब्बल ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलण्यात आला आहे. महाडमधून काढण्यात येत असलेला कचरा बघून नागरिकही अचंबित होत आहेत.

महापूरानंतर महाड शहरात दीड ते दोन फूट चिखलाचा थर जमा झाला होता. घरामधील अन्नधान्य भिजल्यानं कुजण्यास सुरवात झाली होती. बाजारपेठेतील मालही भिजून खराब झाला होता. हा सर्व कचरा शहरातील रस्त्यांवर पडला होता. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. शहराची स्वच्छता करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यामुळे मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पनवेल अंबरनाथ आणि पुणे महानगर पालिकांची यांची स्वच्छता पथके यांत्रिक सामुग्रीसह महाड मध्ये दाखल झाली होती. या शिवाय रायगड जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांचे स्वच्छता कर्मचारी महाड मध्ये बोलविण्यात आले होते.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
शहराची स्वच्छता करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यामुळे मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पनवेल अंबरनाथ आणि पुणे महानगर पालिकांची यांची स्वच्छता पथके यांत्रिक सामुग्रीसह महाड मध्ये दाखल झाली होती.

१० जेसिबी, १ पोकलेन, १० मोठे ट्रक, १० डंपर, ४ ट्रॅक्टर, १ लोडर आणि ६ घंटा गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या शिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे २ हजार सदस्य, नरेंद्र महाराज प्रतिष्ठान ३ हजार सदस्य आणि आदर पुनावाला ट्रस्टचे सदस्य या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते. सात दिवसात तब्बल ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलण्यात आला. अजून सुमारे ३ हजार मेट्रीक टन कचरा शिल्लक आहे. हा कचरा उचलण्याचे काम सुरु आहे. पुरग्रस्त भागात धुर आणि औषध फवारणीचे काम सुरु करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासना मार्फत देण्यात आली आहे.