Maharashtra Mumbai Live News Updates, 30 October 2025 : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिलेले चर्चेचे दिलेले निमंत्रण कडू यांनी स्वीकारले आहे. मात्र याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलन नियोजित ठिकाणी सुरू राहणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज मेळावा घेतला जाणार आहे. ज्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळाबाबत प्रझेंटेशन दिले जाण्याची शक्यता आहे.
तर मोंथा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा पावसाने झोडपले. आजही राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. या सर्व घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
Vasai Virar Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात ७८ हेक्टर शेतीची पाहणी पूर्ण
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनी व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांच्या समोर होत होती. यातील दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्ताकडून देण्यात आले आहेत.
Blood Donation : नवी मुंबईत रक्त तुटवडा; रक्तदान करण्यासाठी आवाहन
Thane Ring Metro : ठाणे अंतर्गत मेट्रोचे बांधकाम सुरू होणार नोव्हेंबर महिन्यात ? २०२९ पर्यंत प्रवासी सेवेत
ठाणे जिल्ह्यातील जि. प. आरोग्यवर्धिनी केंद्रातील योग शिक्षक मानधनापासून वंचित
Gold-Silver Price : काय सांगता ? सोने-चांदी आणखी स्वस्त... जळगावमध्ये आता ‘इतका’ दर
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक
मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडी (MVA) ची बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित आहेत.
Unseasonal Rainfall : धुळे जिल्ह्यातील कापूस, मका, बाजरी, ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान
VVPAT EVM Controversy : 'स्थानिक' निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार? कायदा काय सांगतो?; निवडणूक आयोग म्हणते, 'अभ्यास...'
Police Recruitment: भरपूर झाला सराव, आता पोलीस भरतीसाठी तय्यार; नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३८० जागांवर भरती
गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांच्यात एकच बंधन, नेमके काय ?
परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, रब्बी पेरण्यांचाही खोळंबा; वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्याने मातीमोल
दिवाळी संपली मात्र बोईसरच्या पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम
MPSC Result : 'एमपीएससी'च्या वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, नोव्हेंबर महिन्यात होणार मुलाखती
Video: वाहतूक पोलिसच जाळ्यात अडकले, तरुणाने व्हिडिओ काढत पोलिसांचे चलान फाडले...
Nagpur Farmers Protest : चिमुकल्याचे जोशपूर्ण भाषण, म्हणाला “फडणवीस पहिली गोळी माझ्यावर....”
अधिकारी बदलताच टिटवाळा, मोहने, आंबिवलीत बेकायदा बांधकामांना उधाण
Election Commission: नवी मुंबईत मतदारांचा पत्ता आयुक्तांचे निवास स्थान…!
निवृत्तीवेतनाच्या भानगडी? आता त्या दूर करणारी सुविधा १ नोव्हेंबरपासून होणार उपलब्ध...
खारेगाव येथे नियंत्रक शिधावाटप विभागाची गॅस टॅंकरवर मोठी कारवाई; ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
तळोज्यात दोन हृदयद्रावक आत्महत्या; विद्यार्थिनीचा मानसिक ताण व विवाहितेचा हुंडाबळी
ठाणे महापालिकेची पाणी देयक वसुली मोहीम सुरू; थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू
Farmers Protest Nagpur : सरकारकडून शेतकरी आंदोलकांची फसवणूक; चर्चेचा प्रस्ताव देऊन नेत्यांना अटक
आज संध्याकाळी सात वाजता बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. यापूर्वी आंदोलकांना सबोधित करताना कडू म्हणाले की, आंदोलनात काही गोष्टी भेटल्या नाहीत तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. एकदा ही वज्रमूठ उभी झाली की, यातून शेतकऱ्यांच्या आंदोलकांचं एक चांगलं भविष्य उभे राहिल अशी अपेक्षा आहे. माध्यमांनी हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहचवलं, लोकांच्या मनापर्यंत नेलं. वरचा देव पावला आता खालचा देव पावतो का नाही हे आपल्याला खरंतर संध्याकाळी सात वाजता दिसणार आहोत. आंदोलनात आपण जिंकतो पण कधीकधी तहात हरत देखील असतो. एखादा निर्णय झाला तर चांगला निर्णयही कधीकधी विरोधात वाटत असतो, असं बऱ्याच आंदोलकांच्या बाबतीत आपण नेहमीच होताना पाहिलं आहे. पण आपण आंदोलन करतोय हे महत्त्वाचं आहे. निर्णय कमी जास्त होतातच. एखादा निर्णय सर्वच कार्यकर्त्यांना पटेल असे होत नाही. आंदोलनाबाबत प्रामाणिकपणा असणं महत्त्वाचं आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
आपण यश घेऊनच येऊ, नाही यश भेटलं तर आंदोलन करायला आपल्याला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
Nagpur Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा राज्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार
‘पुनर्वापरातील पाणी वापर प्रकल्पा’ने टंचाईवर मात; पनवेल महापालिकेची दीर्घकालीन उपाययोजना
कळवा रुग्णालयात वाॅर्डचे नुतनीकरण पण, प्राणवायु वाहीनीचा पत्ताच नाही; प्राणवायु वाहीनी बसविण्यासाठी निविदा काढली नसल्याने...
व्हिएतनाम येथील हिरव्या भाताची रायगडमध्ये लागवड…
तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना नाश्त्याऐवजी १० रुपयांचा बिस्कीट पुडा; ठेकेदाराकडून प्रवाशांची लूट
सुनियोजित शहरात इमारतींची अग्निसुरक्षा धोक्यात; दहा महिन्यांत आगीच्या ५९३ घटना

