Mumbai News Update : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात उमेदवाऱ्या, युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होत आहेत. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. यासंदर्भातील राजकीय बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. तसेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. आज ते श्रीनगरमध्ये जनतेला संबोधित करतील. मोदींच्या या दौऱ्यावरही आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबतच्या बातम्याच्यां आढावा आपण घेणार आहोत.