Today’s Live News Update, 27 December 2023: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आमचा लढा आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसंच मुंबईतल्या आंदोलनाची दिशा आपण गुरुवारी स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला राम मंदिराच्या पूजेचं आणि उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नसल्याने संजय राऊत यांनी मंगळवारप्रमाणे आजही भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Marathi News Live Updates | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक
हॉटेलमध्ये नाष्टा करत असतानाच एक वृध्द महिला खुर्चीवरून अचानक खाली कोसळली. सोबत असलेल्या नातेवाईकांना काही सुचण्यापुर्वीच तिच्या हृदयाची धडधड थांबली.
तक्रारदाराच्या वडिलांचे दोन महिन्यांपुर्वी नगरपालिका सेवेत कार्यरत असताना निधन झाले.
अकोला: कृषी क्षेत्रात प्रगतीसोबतच आव्हाने वाढली आहेत. अनियमित पावसामुळे नैसर्गिक संकट ओढवते. वातावरणातील बदलाचे परिणाम समजून घेत संशोधन करण्याची खरी गरज आहे. त्यामध्ये कृषी विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.
यवतमाळ : जानेवारी २०२३ या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुरू झालेले खुनाचे सत्र वर्ष संपत आले तरीही सुरूच आहे. मंगळवारी पहाटे यवतमाळ शहरानजीक दोन मजुरांत मोबाईलवरून वाद होऊन मित्रानेच मित्राचा खून केला. हा खून पकडून गेल्या १२ महिन्यांत जिल्ह्यांत तब्बल ७७ खुनांची नोंद करण्यात आली आहे.
अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कायोसन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात आली. यावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ‘ठिक आहे, टीका करणारे तेच काम करीत असतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज नसते,’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
नाशिक: राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे.
पिंपरी : देहूरोड आणि दिघी भागातील संरक्षित जागेची (रेडझोन) महापालिका नव्याने मोजणी करणार आहे. त्यासाठी एक कोटी १३ लाख ६७ हजार मोजणी शुल्क भूमी अभिलेख विभागाच्या पिंपरी-चिंचवड आणि हवेली विभागाकडे जमा करण्यात येणार आहे.
नागपूर: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीमध्ये काम करण्याची संधी आहे.
पुणे : घरासमोर खेळणाऱ्या मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरी व उपनद्यांच्या पात्राचा संकोच झाल्यामुळे त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता घटल्याचे २००८ मधील महापुरात उघड झाले होते.
उरण : स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या करंजा-कोंढरी येथील अनेक वस्त्यांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून २५ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भाविकांची तवेरा गाडी आणि कंटेनरची धडक हा अपघात घडला.
मुंबई: देशभरात मनोरुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यांना योग्य प्रकारचे उपचार मिळण्याची नितांत गरज आहे.
वसईच्या सुरुची समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या दोन तरुणींचे प्राण वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.
नागपूर : माजी मंत्री काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील पकड लक्षात घेता त्यांना विविध संस्थांमधील चौकशांच्या फेऱ्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका प्रकरणाच्या चौकशी अहवालाचा आधार घेत समितीवर प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे.
वसईतील या बोगस लॅब प्रकरणी नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
नागपूर : चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या पाच महिला विक्री प्रतिनिधींनी संगनमत करून मालकाची फसवणूक करीत चार वर्षात ७४ लाख २५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेले. सराफाने एकूण चार वर्षांचा लेखाजोखा तपासला असता ही बाब उघडकीस आली आहे.
अॅप उघडताच त्यावर थेट ‘पॉर्न’ दिसणे सुरू झाले. या प्रकाराने कर्मचारी भांबावले.
वर्धा : एकाच वेळी अकरा मोर मृत आढळून आल्याने वन विभाग हडबडून गेला आहे. मदनी शिवारात गजानन कुबडे यांच्या शेतात मृत मोर मंगळवारी आढळून आले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपासणी केल्यावर अज्ञाताने विषप्रयोग केला असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
मुंबई, नाशिक येथून येणाऱ्या वाहनांसाठी मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर माणकोली येथे हा वळण भुयारी मार्ग उभारला जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी अरुंद रस्ते आणि दुसरीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक कोंडीचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागतो.
नागपूर : संसदेत बोलणाऱ्या खासदारांना निलंबित केले जाते. अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील विधेयके विनाचर्चा पारित केली जातात. याचा अर्थ देशात लोकशाही संकटात आहे. ती वाचवण्याचा शंखनाद नागपूरमध्ये २८ डिसेंबरला होणाऱ्या जाहीर सभेतून केला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांदा दरात घसरण सुरूच आहे. गेल्या १५ दिवसांत कांद्याचे भाव क्विंटल मागे ११०० ते १२०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाल कांद्याला सरासरी २७०० ते २८०० रुपये क्विंटल भाव होता.
समुद्रकिनार्यावर सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान केले जात आहे. ग्राहकांना हॉटेल्समधून बेकायदेशीररित्या मद्य पुरवले जात आहे.
नाशिक: जिल्ह्यात करोनाचे तीन रुग्ण आढळले असून त्यातील त्र्यंबकेश्वर येथील महिलेची आरटीपीसीआर चाचणी सकारात्मक आली तर सिन्नर तालुक्यातील दोन रुग्ण संशयित आहेत. सविस्तर वाचा...
नागपूर : यशोधरानगरातील दोन महिलांनी एका २६ वर्षीय विवाहित महिलेला काम मिळवून देण्याच्या नावाखाली तिची गुजरातमध्ये विक्री केली. महिलेच्या दोन्ही मुली हिसकावून घेण्यात आल्या. त्या महिलेवर तब्बल ३६ दिवस तीन भावंडांनी दिवसरात्र सामूहिक बलात्कार केला.
नागपूर : देशात पहिल्यांदा भटके-विमुक्त-आदिवासी-बहुजनांची फौज उभारून इंग्रजांना २२ वेळा युद्धात हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील किल्ले वाफगाव आहे. महाराष्ट्रात श्रीमंत मल्हारराव होळकरांनी बांधलेला एकमेव भुईकोट किल्ला शिल्लक आहे.
वाशीम : तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील विनोद बुंधे या शेतकऱ्याने पारंपरिक गहू, हरभरा पिकाला बगल देत भगर आणि राजगिऱ्यासारख्या दिसणाऱ्या क्विनोवा पिकाची लागवड करून नवीन प्रयोग केला. सध्या हे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून एकरी सात ते दहा क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
नागपूर : राज्यात सध्या सुरू असलेला ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा सरकार प्रायोजित असून यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक अशांततेमुळे ५० हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून आदिवासींमधील सूक्ष्म आजारांबाबत राबवल्या जाणाऱ्या संशोधन प्रकल्पाच्या प्राथमिक अहवालात आदिवासींच्या ३१.६ टक्के मुलांमध्ये तंबाखूचे व्यसन आढळले आहे. पूर्व विदर्भातील १८ आदिवासीबहुल गावात हे संशोधन करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. तसंच आता मुंबईतून मोर्चा काढला जाणार आहे. त्याची दिशा आपण उद्या स्पष्ट करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.