Maharashtra Breaking News Live Updates, 14 October 2025 : महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. राज्यातील विरोधी नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. दुसऱ्या बाजूला, पुण्यातील वाडिया महाविद्यालयात मनविसेच्या पोस्टरवरून अभाविप व मनविसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्याच्या चर्चेदरम्यान आता प्रहार जनशक्ती पार्टीसाठी दिलेली जागा जनता दल (सेक्युलर) या पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सरकारने या निर्णयासह माजी मंत्री बच्चू कडू यांना दणका दिला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप अडचणीत येण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांनी जगतापांना समन्स बजावलं असून बीडमधील मोर्चा सोडून मुंबईला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी भाजपा नेते रामदास तडस यांनी केली आहे. अजित पवार तीन टर्म या संघटनेचे अध्यक्ष असून या काळात महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचा आरोपही तडस यांनी केला आहे.
Maharashtra Marathi News Updates : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घटनांचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता
Smart Soonbai Marathi Movie : ‘स्मार्ट सूनबाई’ चित्रपटाच्या टीझरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
Govind Pansare Murder Case : पानसरे हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे, कळसकर, काळे यांना जामीन
"तोवर नोकरभरती करू नका", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; आता शेतकऱ्यांचं आंदोलन उभारण्याची तयारी
अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालं आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच आता शेतकऱ्यांसाठी न भुतो न भविष्यति असं आंदोलन उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला, शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला आणखी १५ दिवसांचा वेळ जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असंही त्यांनी सुचवलं आहे.
ठाणे पोलिसांच्या कारवाईत ‘एमडी’चा साठा जप्त; दोन तस्करांना अटक
बेकायदा बांधकामांविरोधात भाजपच्या माजी नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
कल्याण एस.टी. आगारात चोरट्यांचा सुळसुळाट; महिला प्रवाशांच्या बांगड्या, मोबाईलवर डल्ला
NEET UG 2025 Medical Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी २ हजार ६५० नव्या जागा, महाराष्ट्रामध्ये १५० जागा वाढल्या
कोण आहेत हेल्मेट मॅन ऑफ इंडिया? हेल्मेट वापर, रस्ता सुरक्षा मोहीम त्यांनी का सुरू केली?
वाढवण बंदर निर्मितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; प्रकल्पाला आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या
आरबीआयची पीएम-ई-ड्राईव्ह प्रस्तावाला मंजुरी… पुण्याला एक हजार ई बस मिळणार
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाची धमकी…नाशिकच्या सेवानिवृत्ताला गंडा
Maharashtra Bike Taxi Policy 2025 : रिक्षा आणि टॅक्सीच्या तुलनेत बाईक टॅक्सी स्वस्त
मुख्यमंत्र्यांचे शहर अश्लिल शेरेबाजीत अव्वल, एनसीआरबीच्या अहवालातले वास्तव
मविआ-मनसेचे ते सहा प्रश्न अन् उत्तरासाठी निवडणूक आयोगाने मागितला वेळ, शिष्टमंडळ उद्या पुन्हा चर्चा करणार
शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, "मविआ व मनसेचं शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना भेटलं. यावेळी आमच्यात प्रदीर्घ बैठक झाली. आणचं आणखी एक शिष्टमंडळ निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंना भेटलं. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वाघमारे यांची भेट घेतली. चोकलिंगम यांच्याबरोबरच्या बैठकीत आमचे काही मुद्दे अनिर्णित राहिले आहेत. त्यावर उद्या परत चर्चा होईल. तसेच राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे व निवडणूक अधिकारी चोकलिंगम एकत्रित भेटतील आणि आम्ही सगळे मिळून चर्चा करू. उद्याच आपण पत्राकारांना भेटून माहिती देऊ असं आमचं ठरलं आहे. आमच्या प्रश्नांवर माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी, उत्तर देण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे. उद्या परत चर्चा होईल."
सामाजिक दातृत्व, साधेपणा हीच रतन टाटांची खरी श्रीमंती, रतन टाटांचे विश्वासू सहकारी माधव जोशी यांची माहिती
"ती यादी लपवण्यात छुपा राजकीय हेतू?" मविआ व मनसेचे निवडणूक आयोगाला सहा प्रश्न, निवेदनात काय म्हटलंय?
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल; ७३ गटांसाठीचे आरक्षण जाहीर
प्रारूप मतदारयादीवर हरकतींसाठी मुदतवाढ; नगरपरिषदा, नगरपंचायती निवडणुका
पिंपरी चिंचवडमध्ये सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात 'मॉक ड्रिल'
दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
निवडणूक आयोग दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून वगळणार
आयोग दुबार मतदारांना ते मतदान कुठे करणार हे विचारणार
अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत मग मतदार नोंदणी बंद का आहे?
मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे तर निवडणुकीला कसे सामोरे जाता?
काही ठिकाणी आढळलं आहे की वडिलांपेक्षा मुलाचं वय जास्त, असे घोळ कधी मिटवणार?
मतदार याद्या सक्षम नाहीत मग त्यात दुरुस्त्या करणार का, दुरुस्ती करणार असाल तर ती प्रक्रिया कशी असेल?
मतदार याद्यांचा तपशील संकेतस्थळावर कधीपर्यंत उपलब्ध कराल?
महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, शेकापचे जयंत पाटील, भाकपाचे अजित नवले, मिलिंद नार्वेकर, नितीन सरदेसाई, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, व वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
‘अभाविप’ कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी ‘मनविसे’च्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
पुणे महापालिकेला मतदार यादी देताना निवडणूक आयोगाने वगळली ' या ' मतदारांची नावे !
Police Action in Malegaon: मालेगावात आंध्र प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई.. 'यूएपीए' अंतर्गत तरुणास अटक
तळोजा गावात तीन वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या नावाने सीमकार्डचा वापर
मविआ नेते व राज ठाकरे 'शिवालय'मध्ये दाखल, थोड्याच वेळात निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्रालयाजवळच्या शिवालय (विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचा बंगला) बंगल्यात दाखल झाले आहेत. विरोधी नेत्यांचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना भेटीसाठी १२.३० ची वेळ दिली आहे.
"शिंदेंच्या आठ योजना फडणवीसांनी बंद केल्या", विरोधकांच्या दाव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यावर मोठा भार..."
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या आठ योजना देवेंद्र फडणवीस सरकारने बंद केल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे, तरी देखील आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही.
