सातारा : वाई अर्बन बँकेला शतकोत्तर काळापासून उज्ज्वल बँकिंगची परंपरा आहे. बँकेची सध्याची भक्कम आर्थिक स्थिती पाहिल्यानंतर बँकेचा कारभार सध्याचे संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने चालवीत आहे. ठेवीदारांचे हितास प्राधान्य देत आहे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

त्यांनी वाई अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली, यावेळी त्या बोलत होत्या. बँकेचे अध्यक्ष अनिल देव व उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले व बँकेच्या सद्य कामकाजाची माहिती दिली. चालू आर्थिक वर्षात बँकेचा नक्त एनपीए खूपच कमी झाला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँक सर्व आवश्यक तरतुदी करून नक्त नफ्यात आली आहे. बँकेची तरलता स्थिती उत्तम आहे.

काही आडमुठे कर्जदारांच्या वागण्यामुळे थोडी कर्जे पूर्वी थकीत गेली आहेत. त्यांच्यावर बँकेने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, ही फार चांगली बाब आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत बँकेने सहकार खात्याने केलेल्या मोठ्या सहकार्यामुळे तसेच संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकीत कर्ज वसुलीसाठी चांगले प्रयत्न केले. बँकेचे एन पी ए कमी केले आहेत, ही खूपच समाधानाची बाब आहे. त्याबद्दल संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले. बँकेस आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी आदींनी बँकेची वाटचाल उत्तम चालली असल्याबद्दल तसेच ही बँक रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्देश पूर्ण करीत उत्तम स्थितीत येत असल्याची माहिती खासदार डॉ. कुलकर्णी यांना दिली. यावेळी संचालक काशिनाथ शेलार, रमेश ओसवाल, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, प्रीतम भुतकर, संचालिका सुनिती गोवित्रीकर, सौ. ज्योती गांधी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे आदी उपस्थित होते.