मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यांना दोन आठवड्यांहून अधिक काळ तुरुंगात जावं लागलं होतं.

या घटनेनंतर राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आपली टीकेची तीव्रता वाढली आहे. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून उभारलेल्या पक्षाची उद्धव ठाकरेंनी माती केली, अशा शब्दांत नवनीत राणांनी टीकास्त्र सोडलं. त्या एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

हेही वाचा- आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…

नवनीत राणा म्हणाल्या की, जो भगव्याचा आणि श्रीरामाचा नारा आहे. तो नारा मी कधीच बंद करणार नाही. मग मला यासाठी मला १४ दिवस नव्हे तर १४ वर्षे तुरुंगवास भोगायला लागला तरी चालेल.

हेही वाचा- ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार का? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादावर खासदार राहुल शेवाळे म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना खासदार राणा पुढे म्हणाल्या, “घमंड माणसाला संपवून टाकते, हे मी माझ्या जीवनात ऐकलं होतं. पण उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मी पहिल्यांदा याचं प्रात्यक्षिक पाहिलं. ५६ वर्षे रक्ताचं पाणी करणाऱ्या आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी विचारधारेशी बांधील राहून पक्ष बनवला. रक्ताचं पाणी करत त्या पक्षाला मजबूत केलं. एवढे खासदार आमदार निवडून आले. पण उद्धव ठाकरेंनी त्याची माती करण्याचं काम केलं.”