आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे, कुणीही द्या. आज भिडे गुरुजींनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आमची ताकद वाढते आहे. कुणीही आलं तरीही आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारणारच. एकाचा पाठिंबा घ्यायचा आणि दुसऱ्याचा नाकारायचा हे आमचं धोरण नाही. असं जो करतो तो चळवळीचा कार्यकर्ता नसतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांना संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच तुम्ही उपोषण मागे घ्या आणि लढा सुरु ठेवा अशी विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेतली.

सरकार त्यांच्या परिने प्रयत्न करतं आहे, आमचा लढा आमच्या पातळीवर सुरू आहे. सगळ्या महाराष्ट्राचा एकच उद्देश आहे की मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. भिडे गुरुजी आंदोलनात जोडले गेल्याने आम्हाला बळ मिळालं आहे. आंदोलनाचं बळ वाढतं आहे. प्रत्येक माणसाचं, प्रत्येक घटकाचं बळ आवश्यक आहे. आम्हाला आरक्षणच हवं आहे, कुणीही द्या. भावना महत्त्वाची नाही आमच्या समाजासाठी आम्हाला आरक्षण महत्त्वाचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी संंभाजी भिडे यांच्या भेटीनंतर म्हटलं आहे.

Sharad Pawar criticizes Amit Shah regarding violation of law
‘भ्रष्टाचाराचा सुभेदार ’ म्हणणारे गृहमंत्री कायद्याचे उल्लंघन करणारे तडीपार;  शरद पवार यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
The young man direct request to Chief Minister Eknath Shinde regarding marriage
लग्नासाठी मुलगी मिळेना…तरुणाची थेट मुख्यमंत्र्यांना साद…फलकावर लिहिले, ‘लाडका भाऊ’ योजना…
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
principal, vehicle, female employees,
मानसिक त्रास देण्यासाठी प्राचार्यांनी दिले महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश, प्राचार्यांच्या अजब प्रतापाविरोधात….
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
Ajit Pawar Piyush Goyal
“कांदा निर्यात बंदी करू नका, त्याने अनेकांना…”, अजित पवारांची पीयूष गोयल यांना विनंती
Mayawati on Bhole baba
“बाबा-बुवांच्या नादी लागण्यापेक्षा आंबेडकर…”, हाथरस चेंगराचेंगरीनंतर मायावतींचे दलितांना आवाहन

हे पण वाचा- “एकनाथ शिंदे लबाडी…”, संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं; म्हणाले, “त्यांनी दिलेला शब्द…!”

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. आत्तापर्यंत तीनवेळा मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं नव्हतं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती पुन्हा एकदा करण्यात आली.

संभाजी भिडे यावेळी काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेला लढा हा अभिमानास्पद, कौतुकास्पद आणि योग्य आहे. त्यांच्या या लढ्याला यश येणार यात माझ्या मनात काहीच शंका नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला १०० टक्के यश येणार आहे. हा प्रश्न राजकारणाच्या पातळीवर असला तरीही या महाराष्ट्राचे मुख्यमत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने मी शब्द देतो की मनोज जरांगे यांना जे हवंय ते घडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. त्यांनी लढा सुरु ठेवावा पण उपोषण मागे घ्यावं ही विनंती मी त्यांना करायला आलो आहे असं संभाजी भिडे म्हणाले.