बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी चाहत्यांना एक आवाहन करण्यासाठी एक ट्विट केले आहे. "रविवारी माझ्या बंगल्यासमोर गर्दी करु नका" असं अमिताभ म्हणाले. अमिताभ का म्हणाले असं? सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही करोना व्हायरसचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सरकारने कोठेही गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमिताभ यांनी रविवारी त्यांच्या घराजवळ त्यांना पाहाण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. दर रविवारी अमिताभ आपल्या चाहत्यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी ते करोना व्हायरसमुळे घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे घरासमोर चाहत्यांना गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे. T 3470 - To all Ef and well wishers an earnest request !PLEASE DO NOT COME TO JALSA GATE TODAY .. SUNDAY MEET am not going to come ! Take PRECAUTIONS .. be safe Sunday का दर्शन Jalsa पे cancel है , कृपया कोई वहाँ जमा ना हों आज श्याम को । सुरक्षित रहें pic.twitter.com/USm4kZBEYo — Amitabh Bachchan (@SrBachchan) March 15, 2020 अमिताभ यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही चाहत्यांनी या निर्णयावर आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.