‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत शिवजन्म सोहळा तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या प्रवासाचा शेवट यानिमित्ताने डॉ. अमोल कोल्हे व अभिनेत्री अमृता पवारने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत अमोल कोल्हेंनी या दोन्ही मालिकांबाबत बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली. या मालिकेवरून राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाला, अशी खंत अमोल कोल्हेंनी व्यक्त केली. त्याचसोबत या मुलाखतीत त्यांनी शिवविचारसुद्धा मांडले.

पाहा संपूर्ण मुलाखत-

मालिकेसोबत अभिनयापासून राजकारणापर्यंतचा प्रवास कसा होता, याविषयीसुद्धा त्यांनी मनमोकळेपणानं सांगितलं. तर अमृता पवारने मालिकेत जिजामात साकारताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, त्याची तयारी कशी केली याबद्दल सांगितलं.