अभिनेता कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने देशाच्या विकासाबात आपलं मत व्यक्त केलं आहे. पुढील १०० वर्ष आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही अशी धक्कादायक भविष्यवाणी त्याने केली आहे. Jis desh Main, corruption is the top priority of hospitals, labs, Doctors, politicians, officials and many residents during the pandemic also, that country can’t become a developed country during next 100 years also. It’s unfortunate but it’s the truth. — KRK (@kamaalrkhan) June 13, 2020 काय म्हणाला केआरके? "ज्या देशांत हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा, डॉक्टर्स, राजकारणी आणि इतर उद्योगातील लोक इतका भ्रष्टाचार करतात, तो देश कधीही प्रगती करु शकत नाही. भ्रष्टाचार असाच वाढत राहीला तर पुढील १०० वर्षे आपल्या देशात विकास होऊ शकणार नाही. हे दुर्दैवी पण ते सत्य आहे." अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे. Mumbai Municipal Corp Cancels EoI for Body Bags! BMC Was Buying it at Rs6,719 per piece, Against a Price of Rs 202. It’s just a little difference. See! This is the best thing in our country that there is no corruption at all. — KRK (@kamaalrkhan) June 13, 2020 कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या भविष्यवाणीसाठी केआरकेवर जोरदार टीका देखील केली आहे.