गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटलं जात होतं; तर सुनीता आहुजा यांनी घटस्फोटासाठी याचिकाही दाखल केली होती अशी चर्चासुद्धा सुरू होती. परंतु, नंतर सुनीता यांनी स्वत: या अफवा खोट्या असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी या जोडीच्या नात्याबद्दल व त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांनी सध्या गोविंदा एका मराठमोळ्या अभिनेत्रीला भेटत असल्याचंही म्हटलं आहे.

विकी लालवाणीसह संवाद साधताना पहलाज निहलानी यांनी गोविंदाच्या भूतकाळातील अफेअरबद्दल सांगितलं आहे. यासह पहलाज निहलानींनी गोविंदा आणि सुनीता हे कधीही वेगळे होणार नाही, असं म्हटलं आहे. या मुलाखतीदरम्यान पहलाज निहलानी यांना गोविंदा व मराठी अभिनेत्रीच्या भेटीगाठीबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर ते म्हणाले, “कोणीही गोविंदा आणि सुनीता यांच्या प्रेमाच्यामध्ये येऊ शकत नाही.”

गविंदा व सुनीता यांच्याबद्दल ते पढे म्हणाले, “सुनीता नेहमी तिच्या मनातलं बोलते आणि गोविंदा कधीही भरकटत नाही. त्याचे दहापेक्षा अधिक अफेअर असले तरीसुद्धा त्यांचं लग्न मोडणार नाही. ते कायम वेगळेच राहत आले आहेत. तो नेहमी त्याच्या सर्व मिटिंग कायम त्याच्या बंगल्यामध्येच करत असायचा, कारण तो उशिरा झोपतो. नाहीतर सुनीता नेहमी त्याच्याबरोबर असते. त्याच्याकडे आता एकही चित्रपट नाहीये, पण तो रोज एक कार्यक्रम करतो, ज्याची सगळी व्यवस्था सुनीता करत असते.” परंतु, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनीता यांनी गोविंदाच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आता त्या लक्ष घालत नाही असं म्हटलं होतं.

पहलाज निहलानी यांनी सध्या ते गोविंदा व सुनीता यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं, पण काही दिवसांपूर्वी जेव्हा गोविंदाला बंदुकीची गोळी लागल्याचा अपघात झाला तेव्हा त्यांनी अभिनेत्याची भेट घेतली होती. पुढे पहलाज निहलानी गोविंदा व सुनीता यांच्याबद्दल म्हणाले, “ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.” पहलाज असंही म्हणाले की, २०२४ मध्ये सुनीता यांनी गोविंदाबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर त्यांनी आपआपसात बोलून त्यांच्यातील वाद मिटवले. पहलाज सुनीता यांच्याबद्दल म्हणाले, “तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमध्ये खूप गोष्टी सांगितल्या आणि हे त्याचे परिणाम आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनीता ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या, “आमची दोन घरं आहेत. एका घरामध्ये मी, माझी मुलं असे आम्ही तिघे राहतो. आणि त्याच घरापुढे एक बंगला आहे जिथे गोविंदा राहतो. कारण तिथे त्याच्या सर्व मिटिंग होत असतात आणि तो कायम तिथे बसून त्याच्या मित्रांशी गप्पा मारत असतो.”