Juhi Chawla on Shah Rukh Khan: जुही चावला व शाहरुख खान हे दोन्ही बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. जुही चावला व शाहरुख दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘येस बॉस’, ‘डर’, ‘ड्युप्लिकेट’ हे त्यापैकी काही चित्रपट आहेत.

शाहरुख व जुही दोघेही सहकलाकार असण्याबरोबरच ते व्यावसायिक भागीदारदेखील आहेत. ते कोलकाता नाइट राइडर्स (KKR) या आयपीएलमधील संघाचे मालकदेखील आहेत. आतापर्यंत केकेआरने तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात टीमला सतत अपयशाचा सामना करावा लागाला. एका मुलाखतीत जुहीने खुलासा केला होता की जेव्हा केकेआर लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी दिसायची तेव्हा तिची मुले जान्हवी व अर्जुन मेहता अनेकदा रडायचे.

त्या चित्रपटाचे…

राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीत जु्ही चावला म्हणालेली, “सुरुवातीच्या काळात केकेआर लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी असायची. ते पाहून माझी मुले रडत असत. ते मला म्हणत असत की, तुमची टीम कशी आहे? माझी मुले धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जात असत. त्यामुळे केकेआरला हरलेले पाहणे त्यांच्यासाठी अवघड असे.” धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कून हे अंबानी कुटुंबाच्या मालकीचे आहे. त्यांची मुंबई इंडियन्स टीमदेखील आयपीएलमध्ये खेळते. ती केकेआरची स्पर्धक टीम असे.

केकेआरचे मालक असण्याबरोबर जुही व शाहरुख यांनी चित्रपट निर्मिती कंपनीदेखील सुरू केली होती. दिग्दर्शक अझीझ मिर्झा यांच्याबरोबर त्यांनी निर्मिती कंपनी सुरू केली होती. या कंपनीचे नाव ड्रीम्स अनलिमिटेड , असे होते. या कंपनीने ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘चलते चलते’, ‘अशोका’ या तीन चित्रपटांची निर्मिती केली. मात्र, ही कंपनी नंतर बंद झाली. त्यानंतर शाहरुख व जुही यांच्या तणाव निर्माण झाला होता.

अभिनेत्री त्याबाबत वक्तव्य करीत म्हणाली, “आम्ही ज्या ‘अशोका’ या चित्रपटाची निर्मिती केली केली होती. त्या चित्रपटाचे समीक्षकांकडून कौतुक झाले; मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर चलते चलते हा चित्रपट बनवला गेला. त्यावेळी मी लंडनमध्ये होते. त्याचदरम्यान, अझीझ मिर्झा यांच्या पत्नीचे निधन झाले. अझीझ मिर्झा यांनी स्क्रिप्ट लिहिणे गरजेचे होते. मात्र, त्यानंतर ड्रीम्स अनलिमिटेड कंपनीकडून चित्रपट बनले नाहीत. त्यानंतर शाहरुख व माझ्यात तणावपूर्ण संबंध निर्माण झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अभिनेत्री म्हणाली, “त्यावेळी माझे कुटुंब वाढत होते. माझ्या कामाची पद्धत बदलत होती. आधी आम्ही सेटवर एकत्र काम करीत असायचो. पण, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणांहून काम करावे लागत होते. त्यानंतर आमच्या कामाचे स्वरूप बदलत गेले”, अशी आठवण जुही चावलाने सांगितली.