Sushmita Sen : सुश्मिता सेन भारताची पहिली ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून ओळखली जाते. २१ मे १९९४ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी अभिनेत्रीने ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला होता. आज या गोष्टीला तब्बल ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्रावर अकाऊंटद्वारे मिस युनिव्हर्स स्पर्धेदरम्यानचे काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सुश्मिता सेनने १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. यानंतर सुश्मिताने ‘मैं हू ना’, ‘बीवी नंबर १’, ‘मैने प्यार क्यू किया?’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं. सुश्मिताचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक तरुणी सुश्मिताला आपला आदर्श मानतात.

सुश्मिता सेन ही भारताची पहिली ‘मिस युनिव्हर्स’ आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनेत्रीला नेमका कोणता प्रश्न विचारण्यात होता, त्यावर सुश्मिताने काय उत्तर दिलं. याबद्दल जाणून घेऊयात… सध्या सुश्मिताने ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आज सुश्मिताला मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकून ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने खास पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहेत. “१८ वर्षांच्या मुलीला संपूर्ण विश्वाशी ओळख करून देणारा ऐतिहासिक दिवस” असं अभिनेत्रीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

“एका स्त्रीकडे पाहण्याचा तुझा दृष्टीकोन आणि स्त्री असण्याचं सार काय आहे? यावर अभिनेत्री म्हणाली होती, “स्त्री म्हणून जन्माला येणं…आपलं स्त्रीत्व ही देवाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. स्त्री बाळाला जन्म देते. घरातील पुरुषांना अनेक गोष्टी शिकवते…कुटुंबाची काळजी घेते. घरातील स्त्री प्रत्येक गोष्ट करू शकते…आणि हेच स्त्री असण्याचं सार आहे.”

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मिस युनिव्हर्स’मध्ये सहभागी होण्यापूर्वी देशांतर्गत झालेल्या ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुश्मिताला, “जर तुम्हाला एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल?” हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ऐश्वर्याने राय म्हणाली होती, “माझ्या जन्माची तारीख…” तर, सुष्मिताने “इंदिरा गांधी यांचा मृत्यू. ही घटना बदलेन” असं उत्तर दिलं होतं. या उत्तरामुळे ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुश्मिता विजयी झाली होती, तर ऐश्वर्या रायला उपविजेती ठरली होती.