बोनी कपूर यांच्या बहुप्रतीक्षित ड्रीम प्रोजेक्ट ‘नो एंट्री’च्या सीक्वेलबद्दल काही काळापासून बरीच चर्चा आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटासाठी वरुण धवन, अर्जुन कपूर व दिलजीत दोसांझ यांची नावे पुढे आली होती; परंतु आता बातमी येत आहे की, दिलजीत या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे.

दिलजीत दोसांझचे चाहते त्याला ‘नो एंट्री २’ या कॉमेडी चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक होते; पण आता त्याचे चाहते निराश झाले आहेत. कारण- गायक व अभिनेता दोसांझ या प्रोजेक्टमधून बाहेर पडत आहे.

‘फिल्मफेअर’च्या रिपोर्टनुसार, दिलजीत दोसांझने ‘नो एंट्री २’पासून स्वतःला दूर केले आहे. असे म्हटले जात आहे की, तो या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साहित होता आणि वरुण धवन-अर्जुन कपूरबरोबर काम करण्यासही तो आनंदी होता; परंतु चित्रपटाच्या क्रिएटिव्ह कल्पनेबद्दल त्याचे मत वेगळे होते. त्यामुळे क्रिएटिव्ह मतभेदांमुळे त्याने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपट सोडण्याचे हे आहे कारण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलजीत आणि चित्रपटाच्या टीममध्ये स्क्रिप्टबाबत अनेक वेळा चर्चा झाली; परंतु तो चित्रपटाच्या कंटेंटवर खूश नव्हता. असेही म्हटले जात आहे की, त्याला त्याचे पात्र मजबूत आणि स्क्रिप्ट चांगली हवी होती. परंंतु, ते शक्य झाले नाही, तेव्हा त्याने चित्रपटाला निरोप देणेच योग्य मानले.

आता सर्वांत मोठा प्रश्न असा निर्माण होतो की, दिलजीत गेल्यानंतर चित्रपटात त्याची जागा कोण घेईल. चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर व दिग्दर्शक अनिस बज्मी यांनी अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी लवकरच त्याच्या जागी एखाद्या मोठ्या कलाकाराला साइन केले जाईल, असे मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बॉर्डर २’मध्ये वरुण व दिलजीत दिसणार एकत्र

विशेष म्हणजे दिलजीत आणि वरुण ‘नो एंट्री २’मध्ये एकत्र दिसणार नसले तरी हे दोन्ही कलाकार सनी देओलबरोबर ‘बॉर्डर २’मध्ये काम करीत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे आणि असे मानले जाते की, हा वॉर ड्रामा मोठ्या पातळीवर बनवला जात आहे