गेल्या काही दिवसांपासून स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान म्हणजेच केआरके त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. केआरकेने बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि मीका सिंहसोबत पंगा घेत सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर सलमानने केआरकेला चांगलाच दम भरला होता.  आता केआरकने आणखी एक नवा दावा केलाय. बॉलिवूडमध्ये अर्जुन कपूर त्याचा एकमेव मित्र असून आपण अर्जुनसोबत फोनवर बोलल्याचा दावा केआरकेने केला आहे.

केआरके ने एक ट्विट केलंय. यात तो म्हणाला, ” कॉलसाठी आणि प्रदिर्घ चर्चेसाठी धन्यवाद अर्जुन कपूर भाई. आता मी समजू शकतो की बॉलिवूडमध्ये तुम्ही एकमेव माझे खरे मित्र आहात. शिवाय तुम्ही एकमेव खरे पुरुष आहात जो कुणालाही घाबरत नाही. आता मी तुमच्या सिनेमावर कधीची टीका करणार नाही.” असं केआरके म्हणालाय.

हे देखील वाचा: मेहंदी ते लग्न; यामी गौतमच्या विवाह सोहळ्यातील खास क्षण

अनेक सेलिब्रिटींना केलं होतं टॅग

याआधी देखील केआरकेने अनेक सेलिब्रिटींजना आपल्या ट्वीटमध्ये टॅग केलं होतं. “मी तर अनिल कपूरलाही भाई बोलतो. रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चनला देखील भाई बोलतो. तसचं शाहरुखान, विवेक ऑबेरॉय यांनाही भाई बोलतो. पण माहित नाही हे मीडियावाले माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ का काढतात.” अशा आशयाचं ट्विट केआरकेने केलं होतं.

वाचा: ‘नागिन ३’ फेम अभिनेता पर्ल वी पुरीला अटक, अभिनेत्यासह सहा जणांवर बलात्काराचा आरोप

सलमान खानने केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला होता

दरम्यान काही दिवसांपूर्वीच केआरकेने सलमान खानवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता. यानंतर सलमान खानच्या टीमने कायदेशीर पावलं उचलत केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला. केआरकेने सलमान खानच्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमावर सडकून टीका केली होती.