Entertainment News Updates : भारत व पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या केली, त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांची ९ तळं उद्ध्वस्त केली. आता पाकिस्तान भारताच्या अनेक भागात हल्ला करण्याचे सतत अयशस्वी प्रयत्न करत आहे.

या तणावामुळे काही विमानतळांवरील उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आयपीएल स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे. या तणावाचा परिणाम मनोरंजन जगतावर झाला आहे. अनेक कलाकार त्यांचे कार्यक्रम रद्द करत आहेत, इतकंच नाही तर चित्रपटांच्या प्रदर्शनावरही त्याचा परिणाम झाला आहे.

‘भूल चूक माफ’ थिएटर रिलीज रद्द

राजकुमार राव व वामिका गब्बीचा ‘भूल चूक माफ’ ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यानंतर निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला. थिएटरमध्ये चित्रपट रिलीज करणार नसल्याची घोषणा त्यांनी केली. आता हा चित्रपट ९ मे ऐवजी १६ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

कमल हासन यांच्या चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च रद्द

कमल हासन १६ मे रोजी त्यांच्या ‘ठग लाइफ’ या चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च करणार होते. चेन्नईच्या इनडोअर स्टेडियममध्ये हा इव्हेंट होणार होता, पण आता तो रद्द करण्यात आला आहे. देशातचे जवान सीमेवर लढत असताना असे इव्हेंट आयोजित करणं योग्य नसल्याचं हासन म्हणाले.

सलमान खानचा दौरा रद्द

सलमान खान यूके दौऱ्यावर जाणार होता, पण देशात तणाव निर्माण झाल्याने त्याने हा दौरा रद्द केल्याची माहिती स्वतःच दिली.

तारक मेहता का उल्टा चश्मा

लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये मदर्स डे स्पेशल इव्हेंट होणार होता, पण त्यांनी तो भारत-पाकिस्तान तणावादरम्यान रद्द केला.

अरिजीत सिंगचा कॉन्सर्ट रद्द

अरिजीत सिंगने पहलगाम हल्ल्यानंतर चेन्नईतील शो रद्द केला. त्यानंतर अबू धाबीमध्ये होणारा इव्हेंट रद्द केला आहे.

उषा उत्थुप यांचा कॉन्सर्ट रद्द

गायिका उषा उत्थुप यांचा आज (१० मे रोजी) मुंबईत कॉन्सर्ट होणार होता, पण तोही रद्द करण्यात आला आहे. आयोजकांनीच यासंदर्भात माहिती दिलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अबीर गुलालचं प्रदर्शन थांबवलं

भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. भारत पाकिस्तान तणाव वाढल्याने फवाद खानचा चित्रपट ‘अबीर गुलाल’चं प्रदर्शन थांबवण्यात आलं आहे.