स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र या मालिकेतील प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी लवकरच स्टार प्रवाह वाहिनी नवी मालिका आणि एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर येत्या २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.

colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
spruha joshi sukh kalale and tejashri pradhan premachi gosht between connection
तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, जाणून घ्या…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Ravindra Jadeja Teases chepauk Crowd by Going For Batting Before MS Dhoni
IPL 2024: चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, धोनी आधी फलंदाजीला उतरला अन्… VIDEO होतोय व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोन नंबर झाला लीक, विकृतांनी मेसेज फोनवर केली शरीरसुखाची मागणी

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकची कथा एक लहान मुलगी आणि तिचे गाणे यावर आधारित आहे. स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचा ही मालिका मराठी रिमेक असणार आहे. या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार असणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘…अन् काही क्षणात ती व्यक्ती दिसेनाशी झाली’, अभिनेता विराजस कुलकर्णीला पुण्यात झाला भुताचा भास

दरम्यान ‘मुलगी झाली हो’ ही मालिका टीआरपी रेसमध्ये अव्वल ठरली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका वादामुळे या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या मालिकेतील साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांनी ही मालिका सोडली होती. त्यामुळेच ही मालिका निरोप घेत आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.