Bhagre Guruji Daughter Marathi Actress Anagha Atul : ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे अभिनेत्री अनघा अतुल प्रसिद्धीझोतात आली. तिने या मालिकेत खलनायिका श्वेताची भूमिका साकारली होती. अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची कन्या आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. अनघाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

अनघाच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं, तर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वेध भविष्याचा’ आणि ‘घेतला वसा टाकू नको’ या पौराणिक मालिकांमुळे अतुलशास्त्री भगरे यांना घराघरांत ओळखलं जातं, त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी अनघाने लवकरच लग्न करावं अशी इच्छा तिचे वडील भगरे गुरुजींनी व्यक्त केली. पुढे, त्यांना “तुम्हाला कसा जावई हवा आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भगरे गुरुजी काय म्हणाले जाणून घ्या…

भगरे गुरुजी म्हणाले, “मुलीच्या बाबतीत एक पिता म्हणून काय वाटतं तर, तिला एक उत्तम जीवनसाथी मिळूदेत. मी तिला लग्नामध्येही स्वातंत्र्य दिलं आहे. दोन्ही मुलांना या बाबतीत मी आधीच सांगितलं होतं की, तुम्हाला जो निर्णय घ्यायचाय तो अगदी विचारपूर्वक घ्या… तुमच्या निर्णयाच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे. फक्त पुढे जाऊन कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून तुम्ही फार विचार करून निर्णय घ्या…”

“मला जावई कसा हवाय यापेक्षा आता तो हवा आहे ( मिश्किलपणे ) हे फार महत्त्वाचं आहे. मी तिला त्याही बाबतीत मुभा दिलेली आहे की, तू बघ… तुला जिथे वाटेल की, आपले विचार जुळू शकतात…तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आलेली आम्हालाही चालणार आहे. आम्ही तिला मुभा जरी दिली असली तरी, ती इतका विचार करते की, प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगते. ‘तुम्ही सांगा, तुम्ही निर्णय घ्या…’ असं तिचं नेहमी म्हणणं असतं. खरंतर, मलाही आश्चर्य वाटतं, या क्षेत्रात काम करूनही तिचे विचार कायम आमच्याशी जोडलेले आहेत. तिने भावाचा विवाह इतका उत्तम आणि दणक्यात करून दिला की, आता तिच्या आईला आणि मला तिच्या लग्नाचे वेध लागले आहेत.” असं भगरे गुरुजींनी सांगितलं.

“तू लग्नाचा विचार केव्हा करणार?” या प्रश्नावर अनघा म्हणाली, “२०२६ मध्ये… अरेंज कम लव्ह मॅरेज व्हावं अशी माझी तरी इच्छा आहे. म्हणजे, आवडलंच कोणी तर एकमेकांना समजून घेऊ आणि मग लग्न होईल हेच माझं म्हणणं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनघा उत्तम अभिनेत्री आहेच पण, याचबरोबर ती उद्योजिका सुद्धा आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अनघाने पुण्यातील डेक्कन परिसरात ‘वदनी कवळ’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल आपल्या भावाच्या साथीने सुरू केलं.