अभिनेता अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’चं हे सीझन वाद-विवाद, सदस्यांमधील मैत्री अशा बऱ्याच कारणांसाठी चर्चेचा विषय ठरलं. अपूर्वा नेमळेकरपासून ते अगदी विकास सावंतपर्यंत या सगळ्या सदस्यांनी अगदी प्रेक्षकांना वेड लावलं. यामध्ये आणखी एक चेहरा सतत चर्चेत राहिला तो म्हणजे किरण माने. किरण माने यांनीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रेक्षक किरण यांना भरभरून प्रेम देत आहेत. या प्रेमामुळे ते भारावून गेले आहेत. शिवाय सध्या ते सातारमध्ये आहेत. पण याआधीही किरण यांना ‘बिग बॉस मराठी’साठी विचारणा करण्यात आली होती. याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे.

काय म्हणाले किरण माने?

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने म्हणाले, “बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनसाठी मला विचारण्यात आलं होतं. तेव्हा मी नकार दिला. पण यावेळी मी ठरवलं जर मी एका कॅमेऱ्यासाठी तरसत आहे तर माझ्यासाठी तिथे शेकडो कॅमेरे लागणार आहेत. किरण माने असा आहे तसा आहे या ज्याकाही माझ्याविषयी अफवा पसरल्या आहेत हे लोकांना दिसूदेत.”

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच साताऱ्यात पोहोचलेल्या किरण मानेंची जंगी मिरवणूक, म्हणाले, “डोळ्यांत पाणी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“किरण माने आहे तसाच आहे हे लोकांना दिसलं पाहिजे. म्हणून मी या शोसाठी होकार दिला. एक कॅमेरा माझ्यापासून हिरवला आता शेकडो कॅमेरे माझ्यासाठी लागणार ही संधी मला मिळाली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाताना हीच भावना माझ्या डोक्यामध्ये होती.” किरण मानेंनी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रवेश करत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.