अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. २० नोव्हेंबर २०२३पासून सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली. या मालिकेतील कला-अद्वैतच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मालिकेच्या एका प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये कला-अद्वैत भन्नाट उखाणा घेताना पाहायला मिळत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा हा नवा प्रोमो नेटकऱ्यांना खूप आवडला असून त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लग्नानंतर पहिल्यांदा अद्वैत कलाला घेऊन तिच्या घरी गेलेला दिसत आहे. यावेळी कलाची आई दोघांचं औक्षण करते आणि घरात बोलवते. पण शेजारील लोक कला-अद्वैतला थांबवून उखाणा घ्यायला सांगतात. तेव्हा दोघं भन्नाट उखाणा घेतात.

हेही वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस, अभिनेत्याने प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

अद्वैत उखाणा घेत म्हणातो, “लग्न मांडवात घरची मंडळी हिच्यावरच अडली आणि खरेंची कला गळ्यातच पडली.” त्यानंतर कला देखील अद्वैतच्या तोडीस तोड उखाणा घेते. कला म्हणते, “नाकावर राग आणि गालांचे फुगे, इगो घेऊन बाजूला अद्वैत राव उभे, माहिती नाही अजून काय-काय सहन करावं लागणार आहे मला, पण पुरुन उरले तुम्हाला ही कला.”

कला-अद्वैतचा हा भन्नाट उखाणा नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिल आहे, “रॉकिंग कला-अद्वैत. तुमची जुगलबंदी जगात भारी आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “अरे ही कमाल जोडी आहे. टॉम अँड जेरी सारखे भांडणं करतात. सुरुवातीला अद्वैत आवडत नव्हता पण आता लय आवडतो. जगात भारी जोडी आहे.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “शेरास सव्वाशेर”

हेही वाचा – किशोरी अंबिये यांची लेक ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम? कोण आहे? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ईशा व अक्षरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या स्थानावर ही मालिका असते. गेल्या आठवड्याच्या टीआरपी यादीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका तिसऱ्या स्थानावर होती.