मराठी मनोरंजनसृष्टीत एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज देत आहेत. काही दिवसांपूर्वी गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनने नात्याची कबुली दिली होती आणि लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने आशिष कुलकर्णीबरोबर साखरपुडा उरकला आहे. तर अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांनीही साखरपुडा उरकला असून लग्नाची तारीख जाहीर केली.

“…आणि आम्ही बंधनात अडकलो”, स्वानंदी टिकेकरचा साखरपुडा थाटात संपन्न, फोटो आला समोर

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि ‘इंडियन आयडॉल १२’ फेम आशिष कुलकर्णी यांनी नुकतीच सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली होती. तसेच या जोडप्याने शुक्रवारी एक पोस्ट शेअर करत लवकरच एंगेजमेंट करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात म्हणजेच रविवारी त्यांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला. त्यांनी या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्वानंदीने एंगेजमेंटनंतर तिच्या व आशिषला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल भावना व्यक्त केल्या. “आमच्या सोशल मीडिया पोस्टवर आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्हाला खरोखर खूप चांगलं वाटत आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. सध्या मी एवढंच सांगू शकते की मी खूप आनंदी वातावरणात आहे. मी आमच्या आयुष्यातील एका फ्रेश, नव्या अध्यायाची वाट पाहत आहे. आशिष आणि मी आमच्या जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत हा खास वेळ घालवत आहोत,” असं स्वानंदीने ‘इ-टाइम्स’ला सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्वानंदी ही ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची कन्या आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी ती विशेष ओळखली जाते. ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका केल्या होत्या.