गेल्या काही दिवसांपासून जुन्या मालिका ऑफ एअर होऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचे सत्र सुरुच आहे. नवनवीन विषयावर आधारित असलेल्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी अभिनीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण यामुळे घराघरात पोहोचली प्रेक्षकांची आवडती मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता निरोप घेण्यास सज्ज झाली आहे. काल मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. हा शेवटचा क्षण मालिकेतील कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली…

Cyber ​​thieves cheated people, Pune, Cyber ​​thieves,
पुणे : सायबर चोरट्यांकडून दोघांची ५७ लाखांची फसवणूक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
india s manufacturing sector hits 8 month low amid declining output
निर्मिती क्षेत्राची वाढ आठ महिन्यांच्या नीचांकी; सप्टेंबर महिन्यात पीएमआय निर्देशांक ५६.५ गुणांवर
Sunil Gavaskar Statement on Mumbai Potholes and Praised Lucknow to Ayodhya Road in IND vs BAN
IND vs BAN: मुंबईकरांना खड्ड्यांची सवय, रस्ते बांधणाऱ्यांचं उखळ पांढरं, गावस्करांनी कॉमेंट्री करताना लगावला टोला
Bikers Spend An Hour At Versova Madh Jetty For A 15 Minute Journey Video
“निवडणुकांच्या तोंडावर फक्त खोटी आश्वासनं” १५ मिनिटांच्या प्रवासाला दोन तासांची रांग; मढ जेट्टीचा VIDEO पाहून येईल संताप
‘सेबी’कडून सहा गुंतवणूक बँकांची चौकशी; छोट्या कंपन्यांच्या ‘आयपीओ’ प्रक्रियेत सहभागाचा दावा
‘सेबी’कडून सहा गुंतवणूक बँकांची चौकशी; छोट्या कंपन्यांच्या ‘आयपीओ’ प्रक्रियेत सहभागाचा दावा
Jewellery worth two crore 65 lakhs was robbed by opening lockers of account holders
खातेदाराचे लॉकर परस्पर उघडून दोन कोटी ६५ लाखांचे दागिने लंपास
A new serial will be aired on Marathi channels
मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांचा श्रीगणेशा

एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका ऑक्टोबर २०२१ला प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर-नवाथे, नम्रता प्रधान अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी मालिकेतील आपापली पात्र उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळेच शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत झाली भावुक; म्हणाली, “तो खूप…”

या मालिकेला सुरुवातीपासून प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील ट्विस्ट रटाळवाणे न वाटता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीतही काही मागे नाही. पण आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ शेवटच्या टप्प्यात आली आहे. काल मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कलाकारांनी शूटिंगचा शेवटचा दिवस जबरदस्त अंदाजात साजरा केला.

हेही वाचा – मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय-बच्चन व सलमान खानने एकमेकांना मारली मिठी? फोटो आला समोर

मालिकेतील कलाकारांनी शूटिंगचा शेवटचा दिवस आठवणीत राहण्यासाठी व्हरांड्यातील रांगोळीत रंग भरले. एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या. केक कापून सेलिब्रेशन केलं. यावेळी कलाकारांनी मालिकेच शीर्षकगीत गाऊन केक कापला. शिवाय खास जेवणाचा बेतही केला होता.

हेही वाचा – “जगबुडी होईल पण ही मालिका…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “भिकेचे डोहाळे…”

दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या वेळेत २० नोव्हेंबरपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येणार आहे.