मुंबई : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री घाटकोपर परिसरात उघडकीला आला. याबाबत पंतनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. नितेश सावंत असे या मृत तरुणाचे नाव असून तो घाटकोपरच्या गौरीशंकर वाडी परिसरात राहत होता. शनिवारी त्याचा वाढदिवस असल्याने काही मित्रांनी रविवारी साईबाबा मंदिर परिसरात पार्टी आयोजित केली होती. याच वेळी दारूच्या नशेत असलेल्या काही जणांमध्ये पूर्वीच्या भांडणावरून पुन्हा वाद झाला. या वादाची परिणती जोरदार हाणामारी होण्यात झाली. यावेळी बाबू केंडे, संकेत खरात आणि त्यांच्या इतर पाच साथीदारांनी नितेशवर चाकु आणि काचेच्या बाटल्यांनी जोरदार हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या काही मित्रांनी त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत, सातही आरोपींना अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2019 रोजी प्रकाशित
घाटकोपरमध्ये पूर्ववैमनस्यातून मित्राची हत्या
मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री घाटकोपर परिसरात उघडकीला आला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-07-2019 at 00:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 27 year old allegedly killed by friends during birthday celebration in ghatkopar zws