लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः नीरव मोदीने केलेल्या बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्थावर मालमत्ता व बँक ठेवी अशा २९ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ६४९८ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बुधवारी ईडीकडून सांगण्यात आले.ईडीने नीरव मोदी व त्याच्याशी संबंधीत समूहाच्या जमीन, इमारती व बँक ठेवी अशा एकूण २९ कोटी ७५ लाख रुपयांची माहिती घेतली होती. त्यांच्यावर आता ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणात आतापर्यंत स्थावर आणि जंगम अशा एकूण २५९६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून तो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण विभागही (सीबीआय) या प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांच्या पीएनबी बँकेच्या फसवणूक प्रकरणात पीएमएलए कायद्या अंतर्गत ईडीने गुन्हा दाखल होता. नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांना फरार घोषित केल्यानंतर आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याच्या जंगम आणि स्थावर अशा एकूण ६९२ कोटी ९० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती. तसेच १०५२ कोटी ४२ लाख रूपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकेला परत करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>अखेर धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द; स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर डीआरपीपीएलची माघार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीरव मोदीने वर्षाच्या सुरूवातीला ब्रिटन येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होेता. तो तेथील न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नीवर मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या तो ब्रिटनमधील तुरुंगात आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.