मुंबई : पवई तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले असून, आतातरी पवई तलावाबाबत पालिकेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहेत. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालावाची स्वच्छता आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी रहिवाशांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे तक्रार केली होती. याप्रकरणी त्वरित हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना जलपर्णी हटविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागमी करण्यात आली होती.

दरम्यान, पवई तालावातील जलपर्णीचा वेढा रोखण्यासाठी मंगळवारी तालावातील सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. याचबरोबर तलावातील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यवळाचा वापर करावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. या पार्श्वभूमीवर तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याबाबत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी खंत व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) तीन वर्षांपूर्वीच पवई तलाव संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) समन्वय समितीची बैठकही घेतली होती. तरीही आजपर्यंत सांडपाणी थेट तलावात सोडले जात असल्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे कुमार म्हणाले.

तलाव संवर्धन क्षेत्र घोषित करावे

पवई तलाव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी पवईतील जलवायू विहार येथील रहिवासी पामेला चीमा आणि इतर रहिवाशांनी केली आहे. येथील रहिवासी म्हणून आम्ही या परिसराचे संरक्षण करण्यास बांधील आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अतिरिक्त महानगपालिका आयुक्तांचे निर्देश

तलावातील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा.

तलावाच्या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे, या कामासाठी पुढील आठवड्यात कार्यादेश देण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच या नदीच्या काठावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल. या कामांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.