मुंबई : महाराष्ट्रात मागील वर्षभराच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, औद्योगिक गुंतवणुकीत पीछेहाट झाली, बेरोजगारी वाढली, मात्र तरीही कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता न दाखविणारे शिंदे-फडणवीस यांचे हे ‘कुराज्य’ लवकरात लवकर जावे, हीच राज्यातील जनेतची इच्छा आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सरकारच्या वतीने वर्षभरात केलेल्या विकास कामांची जाहिरातींच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडले व राज्यात असंविधानिक मार्गाने स्थापन झोलल्या शिंदे-फडणवीस सरकारने एक वर्ष पूर्ण केले. वर्षभरात या सरकारने एकही कल्याणकारी निर्णय घेतलेला नाही. अतिवृष्टी व गारपीटीने शेतकरी संकटात सापडला असताना सरकार मदतीची केवळ घोषणा करते पण एक दमडीही शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही. शिंदे सरकारच्या जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या सात महिन्यांच्या काळातच राज्यात १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याला या सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यांत २० ठिकाणी दंगली घडवून आणल्या. या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबईसारख्या महानगरात दिवसा ढवळय़ा लोकलमध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, असे पटोले म्हणाले.