मुंबई: ठाण्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये २४ तासांत ढगाळ वातावरण राहणार असून सायंकाळी हलक्या सरींची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान ३४ ते ३८ अंश सेल्सिअस राहील.
आणखी वाचा-अंधेरी, जोगेश्वरीत उद्या पाणीपुरवठा बंद, आजच पाणीसाठा करावा लागणार
आज ठाणे
आणखी वाचा-नंदूरबार, धुळे, नाशिकला हवामान विभागाचा इशारा; दुपारनंतर वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता
जळगाव येथे वादळी पाऊस
जळगाव येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. वादळी वाऱ्याबरोबर विजाही कडाडत होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाली होती.
धुळ्यात पावसाची हजेरी
धुळे शहरातदेखील आज पावसाने हजेरी लावली. काही भागात गारादेखील पडल्या आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागात गारांसह जोरदार पाऊस पडला.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.