मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी असा वाद पेटला आहे. टिपू सुलतानच्या नावाला भाजपासह बजरंग दलाने विरोध केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भाजपाने या क्रीडा संकुलासमोर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपा नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “मग सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचं गुणगाण गात गौरव केला होता. योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी भाजपाने त्यांचा राजीनामा घ्यावा”.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “हिंदूंवर अत्याचार करणारा…”

“टिपू सुलतानचं काय करायचं ते सरकार पाहून घेईल. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही. तुम्ही कशाप्रकारे इतिहास लिहिताय, बदलताय…अगदी दिल्लीत कसा नव्याने इतिहास लिहायला घेतला आहे हे आम्हाला माहिती आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हा सगळा इतिहास आम्हाला सांगण्याची गरज नाही,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

टिपूचा राष्ट्रपतींनी केलेला गौरवार्थ उल्लेख भाजपा विसरले का?; नामकरणावरुन सचिन सावंत यांचा सवाल

“आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील तज्ज्ञ कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही,” असा सूचकवजा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला.

“मुंबईत काय करायचं त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार समर्थ आहे. काळजी कऱण्याचं कारण नाही. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नका,” असंही यावेळी ते म्हणाले.

यापूर्वीही झाला होता वाद..

गोवंडीमधल्या एका उद्यानाला शिवसेनेच्या एम-पूर्व प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविकेने टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यासाठी भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्यान समितीकडे एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र ट्वीट करताना मुंबई भाजपाने शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला होता. “हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदू द्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्रमांक १३६ च्या उद्यानाला द्यावे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे. जनाबसेनेच्या या चमत्कारिक मागणीविरोधात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्या समितीला पत्र लिहिले आहे”, असं ट्वीट मुंबई भाजपाकडून करण्यात आलं होतं.

संजय राऊत यांनी राहुल गांधींनी मोदी सरकारचा दबाव असल्याने ट्विटर फॉलोअर्स वाढत नसल्यासंबंधी लिहिलेल्या पत्राबद्दल ते म्हणाले की, “राहुल गांधी यांची पत्रकार परिषद ऐकू, ते समजून घेऊ. नक्कीच सोशल माध्यम हे केंद्र सरकारच्या दबावाखाली आहेत. राहुल जे काय म्हणतात ते पाहू आणि आमचं मत व्यक्त करू”.