मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने बोरिवली – गोरेगाव दरम्यानचा ब्लॉक रद्द केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी जात असतात. मात्र पश्चिम रेल्वेने १४ मे रोजी बोरिवली – गोरेगावदरम्यान विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हा ब्लॉक रद्द करण्याची मागणी प्रवासी संघटनांबरोबरच लोकप्रतिनिधी, सामाजिक नेत्यांकडून करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारचा बोरिवली-गोरेगावदरम्यानचा ब्लॉक रद्द केला.

jawans killed seven Naxalites during encounter in Chhattisgarhs Dantewada
गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द
Mumbai, block on Western Railway, mega-block,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Allotment of houses near railway stations to CIDCO
रेल्वे स्थानकांलगतच्या घरांची सिडकोची सोडत;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी ऑक्टोबरमध्ये दसरा सोडत प्रक्रिया करण्यासाठी जोरदार हालचाल
Metro 3, Aarey to BKC Metro, Dussehra,
मेट्रो ३ : आरे ते बीकेसी टप्पा दसऱ्यापूर्वी वाहतूक सेवेत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी

हेही वाचा…खासगी भूखंडावरील वृक्ष छाटणीसाठी सोसायट्यांना नोटीस, प्रति झाड ८०० रुपये ते चार हजार रुपये शुल्क

दरम्यान, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले. त्यामुळे मध्य रेल्वेवरून प्रवास करताना प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.