नागपूर : दहावीत नापास होण्याची भीती वाटत असल्यामुळे नैराश्यात गेलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळजाईनगर, गारगोटी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता सागर जिभकाटे (वय १५, रा. तुळजाईनगर, गारगोटी परिसर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. एकताच्या कुटुंबात आईवडिल आणि लहान भाऊ आहे. तिचे आई-वडिल मजुरी करतात. तर लहान भाऊ नववीला शिकतो.

 एकताने दहावीची परीक्षा दिली होती. परंतु मागील पाच-सहा दिवसांपासून तिला नापास होण्याबाबत भीती वाटत होता. त्यामुळे तिने नैराश्यातून तिने शनिवारी २० मे रोजी सकाळी ११ वाजता घरी कोणीच नसताना घराची आतुन कडी लाऊन सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी सागर बाबुराव जिभकाटे (वय ४२) यांनी दिलेल्या सुचनेवरून हुडकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक माधव गुंडेकर यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. आत्महत्येपूर्वी एकताने कुठलीही सुसाईड नोट लिहिली नाही. तिच्या या पावलामुळे तिच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे.