नागपूर: हत्येप्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेच्या काळात तो पॅरोलवर बाहेर आला आणि नंतर तो कारागृहात परतलाच नाही. तब्बल १२ वर्षे तो फरार होता. मात्र अचानक त्याने आत्मसमर्पण केले. हे सर्व कशासाठी तर मुलीच्या शिक्षणासाठी.

संजय तेजने याला हत्येच्या प्रकरणात २००५ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगत असताना संजय दोन वेळा पॅरोलवर बाहेर आला होता. पहिल्यांदा तो जेव्हा तुरुंगातून बाहेर आला तेव्हा पत्नी गर्भवती होती. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यानंतर संजयने शिक्षा माफ करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. पण तो फेटाळण्यात आला. त्यानंतर संजयने पॅरोलसाठी अर्ज केला व तो मंजूर झाला. पण यावेळी तो परत कारागृहात गेला नाही. तो फरार होता.

हेही वाचा – बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर; दिव्यांग मंत्रालय विभाग केवळ नावापुरतेच!

हेही वाचा – सत्ताधाऱ्यांकडून गांधींच्या मारेकऱ्यांना ‘थोर नायक’ ठरविण्याचा प्रयत्न – वडेट्टीवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या काळात संजयने मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. संजय यांच्या मुली श्रद्धा आणि श्रुतीने १२ वीत अनुक्रमे ८६ आणि ८३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर १२ वर्षांपासून फरार असलेल्या संजयने आत्मसमर्पण केले. या १२ वर्षांत संजय फरार होता पण त्याचे आयुष्य कारागृहापेक्षा वेगळे नव्हते. पकडले जाऊ नये म्हणून दडून बसला होता. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी ही त्याची धडपड होती.