लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यात ३ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान विजेची मागणी सुमारे २८ हजार ‘मेगावॅट’पर्यंत गेली होती. परंतु राज्यातील बऱ्याच भागात वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने ही मागणी सुमारे एक हजार मेगावॅटने कमी झाली आहे.

Finally forest department succeeded in imprisoning the leopard in Vasai Fort after 25 days
अखेर वसई किल्ल्यातील बिबट्या जेरबंद, २५ दिवसानंतर वनविभागाला यश
Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
Damage to crops on 82 thousand hectares due to hailstorm
गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट

राज्याच्या बऱ्याच भागात ३ जूनला दुपारी ३ वाजता दरम्यान विजेची मागणी २८ हजार ‘मेगावॅट’च्या जवळपास होती. त्यापैकी १० हजार ३४५ ‘मेगावॅट’ वीज केंद्राच्या वाट्यातून राज्याला मिळत होती. तर ८ हजार १३७ ‘मेगावॅट’ वीज महानिर्मितीकडून मिळत होती. गेल्या एक- दोन दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे तापमानात घट झाली.

हेही वाचा… पटोलेंच्या टीकेवर फडणवीस यांचे प्रत्युत्तर, म्हणाले ज्यांना टॉयलेटला….

परिणामी नागरिकांकडे वातानुकुलीत यंत्र, कुलर, कृषीपंपाचा वापर कमी झाल्यामुळे सोमवारी (५ जून) दुपारी ३.३० वाजता राज्यातील वीजेची मागणी कमी होऊन २६ हजार ८३० मेगावॅटवर आली. त्यापैकी ६ हजार ४४५ मेगावॅट वीज निर्मिती महानिर्मिती करत होती. तर केंद्राच्या वाट्यातून राज्याला १० हजार मेगावॅट वीज मिळत होती.