नागपूर: राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली आहे. याबाबत जिल्हाधिका-यांना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विदर्भासह राज्याच्या विविध भागात रविवारपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे विदर्भात कापूस आणि फळबागांना फटका बसला आहे. सोमवारी नागपूर दौ-यावर असलेल्या फडणवीस यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्थ केले. ते म्हणाले आम्ही सर्व जिल्हाधिका-यांना पीक हानी बाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

हेही वाचा… सेवाग्रामचा चरखा थेट वेल्सच्या संसदेत! कसा झाला प्रवास वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीवर बोलण्यास फडणवीस यांनी नकार दिला. महायुतीचे जागा वाटप अंतिम झाले नाही. २६/ २२ हा जागावाटपाचा आधार असेल.पण तीनही पक्षाच्या चर्चेच्या वेळी तो बदलू शकतो, असे फडणवीस म्हणाले.