राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या उपस्थितीनं गाजला. मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विरोधी पक्षानं भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्ता येते जाते म्हणत मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवत अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सवाल केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“देश महत्वाचा आहेच, मग नवाब मलिकांना एक न्याय आणि प्रफुल्ल पटेलांना दुसरा न्याय का? प्रफुल्ल पटेलांबाबतही पत्र लिहा. या पत्राच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
News About Akshay Shinde
Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा
sudha murthy on rakshabandhan
Sudha Murthy : “बहीण आपल्या भावासाठी कितीही…”, रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुधा मूर्तींनी सांगितली कहाणी!
Eknath Shinde, Badlapur, Ladki Bahin Yojana,
लाडकं सरकार लक्षात ठेवा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

“…तर त्याच्यावरही तोच न्याय लागला पाहिजे”

यावर देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले, “नवाब मलिकांवर आरोप, त्यांच्यासारखं तुरूंग कुणी भोगलं असेल अथवा तशी परिस्थिती कुणाचीही असेल, तर त्याच्यावरही तोच न्याय लागला पाहिजे, हे सांगतो.”

“उद्धव ठाकरे विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात”

‘आम्ही धारावीकरांचा विकास मागतोय, त्यांच्या मित्रांचा विकास नाही’, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, ” धारावीचं पहिलं कंत्राट अडाणींना नव्हतं. पहिलं कंत्रात रद्द करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या सरकारनं केलं. उद्धव ठाकरे विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात. धारावीच्या लोकांना घर मिळू नये, अशी उद्धव ठाकरेंची नीती दिसत आहे. त्याअंतर्गतच उद्धव ठाकरेंचं काम चालू आहे.”