लोकसत्ता टीम
बुलढाणा: जळगावसह जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असतानाही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नाही. यामुळे जळगाव तालुका शिवसेनेने थेट पोलिसांत पालकमंत्री बेपत्ता झाल्याची तक्रार दिली! एवढेच नव्हे तर शोधणाऱ्यास अकराशे रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले. शेकडो शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली, अनेक घरे जमीनदोस्त झाली तर अनेक घरातील गृहोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. मात्र पालकमंत्री पाटील यांनी साधी धावती भेटही जिल्ह्यात दिली नाही. उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल दिली.