चंद्रपूर : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. तप्त उन्हामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. उन्हा तडाखा आता जिवघेणा ठरू लागला आहे. रविवारी सायंकाळी भद्रावती बस स्थानकासमोर राजू भरणे (३९) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. आज चंद्रपूर शहराचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी ४५.० अशांवर पोहोचले. उन्हामुळे शहरात अघोषित संचारबंदी लागू असल्याचे दिसून येते. शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य असतात. उन्हामुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे.

ujani dam, rain, Pune district,
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पुढील महिनाभराच्या पावसावर उजनीचे भवितव्य
Rain, Western Ghats, Almatti dam,
सांगली : पश्चिम घाटात संततधार सुरूच, महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून १ लाख क्युसेकचा विसर्ग
एसटी बसमध्ये प्रवासी विनातिकीट सापडल्यास…’या’ निर्णयाला वाहकांचा विरोध
यवतमाळ : जुगार खेळण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण! ‘या’ जिल्ह्याची अशी ओळख चिंतनीय
Flood, Raigad, rain, Nagothane,
अतिवृष्टीमुळे रायगडात पूरस्थिती; नागोठणे, आपटा, खोपोली परिसराला पुराचा तडाखा
Heavy Rainfall in Thane District, Knee-deep water accumulated near kamwari river house, Severe Flooding in Bhiwandi, Disrupts Life and Commerce, Heavy Rainfall in Bhiwandi, Bhiwandi news, marathi news, latest news,
भिवंडी पावसाचे पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, कामवारी नदी काठच्या वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले
Saputara hills
Video: भयानक! ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पर्यटकांच्या बसला अपघात; प्रवाशाच्या मोबाईलमध्ये धक्कादायक दृश्य कैद!
Tulsi Lake saved the lives of thousands of Mumbaikars
२६ जुलै २००५ च्या महापुरात तुळशी तलावामुळे वाचले होते हजारो मुंबईकरांचे प्राण; जाणून घ्या, कसे?
kolhapur river
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

हेही वाचा : चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात एक ठार

अशातच, आज भद्रावती बसस्थानकासमोर फिरत असताना राजू भरणे अचानक खाली कोसळले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अतिमद्यप्राशनामुळे ते झोपले असावे, असे तेथून येणाऱ्या-जाणाऱ्यांना वाटले. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते उठले नाही. काहींनी जाऊन पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांना माहिती दिली.

उष्माघातामुळे होणारा त्रास

मनुष्याचे शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सियस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो.

हेही वाचा : बुलढाणा : चालकाचे नियंत्रण सुटले अन् भरधाव ‘स्कॉर्पिओ’ उलटली, भीषण अपघातात एक ठार, चार जखमी

विदर्भात ६९ रुग्णांची नोंद

विदर्भातील अकरा जिल्ह्यात १ मार्च २०२४ ते १४ मे २०२४ पर्यंतच्या कालावधीत उष्माघाताचे ६९ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी सर्वाधिक २१ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील होते. नागपूर ग्रामीणमध्ये ११, गोंदिया ६, गडचिरोली ६, चंद्रपूर २, अकोला ५, अमरावती ३, भंडारा १, वर्धा ६, वाशीम १ व यवतमाळ जिल्ह्यात ७ रुग्ण नोंदवले गेले.