लोकसत्ता टीम

नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात ई- रिक्षा चालकांकडून नियम धाब्यावर बसवून क्षमतेहून दुप्पट प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी

जिल्हा परिवहन समितींकडून ई- रिक्षा वाहतुकीसाठी मार्ग निश्चित करून देण्यात आले आहेत. त्यानंतरही नागपुरात नियम धाब्यावर बसून सर्रास महामार्गावरही रिक्षाची प्रवासी व मालवाहतूक केली जात आहे. हा प्रकार शहरातील विविध रस्त्यांवर दिसत असतानाही शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे ई रिक्षाच्या नियमबाह्यकृतीला समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा… नागपूर: प्रेमविवाह केल्याचा राग; सासऱ्यासह तिघांचा जावयावर प्राणघातक हल्ला

दरम्यान, येथे क्षमतेहुन दुप्पट प्रवासी वाहतूक तसेच प्रवासी ई रिक्षावर जास्त वजनांची मालवाहतूक केली जात असल्याने शहरात सर्वत्र अपघाताचाही धोका वाढला आहे. या अपघातात कुणाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.