नागपूर :यावर्षी अधिकमास आल्याने आषाढानंतर अधिक मास आणि मग श्रावण महिना सुरू होणार आहे. हा अधिकमास फार पवित्र समजला जातो.आजपासून अधिक मास सुरू होत आहे. नवीन लग्न झालेल्यांसाठी यांचे विशेष महत्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि जावयाला अधिकमासाचे ३० आणि ३ असे वाण देतात. या अधिकमासात या ३३ आकड्याचे महत्व काय आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या. रसगुल्ले इत्यादी वस्तू वाण म्हणून देतात त्याला धोंडे असे म्हणतात.

या बाबत ज्योतिषाचार्य प्रीती राजंदेकर यांनी सांगितले. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा ३२ महिने १६ दिवस आणि ८ तासांनंतर म्हणजे साधारण ३३ महिन्यांनंतर येतो. या ३३ महिन्यांसाठी म्हणून ३३ वस्तूंचे दान केले जाते. या उल्लेख अनेकदा तीस – तीन असा केला जातो. कारण महिना ३० दिवसांचा असतो. या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत ठेवतात. उदा. जर एकवेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे तीन दिवस दिवसातून २ वेळा करून हे पुढील ३ दिवस भरून काढावे लागतात.

हेही वाचा >>>नागपूर : बीएस्सी नर्सिंगच्या वसतिगृहातील पाणी दूषित

३३ ही संख्या अधिकमासामध्ये महत्वाची आहे. ३३ कोटी देव असल्याने ३३ ही संख्या महत्वाची आहे.अधिकमास म्हणजे पृथ्वीचे सूर्या भोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यात ३६५ दिवस ५ तास, ४८ मिनीटे आणि ४७ सेकंद असतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र चंद्राच्या पृथ्वी भोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चंद्रमास मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.

हेही वाचा >>>नागपूरः महिलेच्या आंघोळीची चित्रफीत काढणाऱ्या डॉक्टरची वसतीगृहातून हकालपट्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौरमास आणि चांद्रमास यांची सांगड घालण्यासाठी तसेच हा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिकमासाची योजना करण्यात आली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षयमास आणि अधिकमास टाकून ही कालगणणा सूर्याधारीत सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते असेही त्यांनी सांगितले.