नाशिक : जळगाव, उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जळगावला वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. सुमारे ११०८ हेक्टरवरील केळी, गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिकमध्ये १७२ हेक्टरवरील द्राक्षबागा, गहू आणि कांदा रोपांचे नुकसान झाले.

जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे अधिक नुकसान झाले. यावलच्या १८ गावातील १३७५ आणि रावेरच्या तीन गावांमधील ३२ शेतकऱ्यांना फटका बसला. कृषी विभागाच्या पाहणीत यावलमध्ये १०९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यात ५८८.५ हेक्टरवरील हरभरा, ३८२ हेक्टरवरील केळी, ४९.५ हेक्टरवरील मका, ५४ हेक्टरवरील गहू आणि १९ हेक्टरवरील तुरीचा समावेश आहे. रावेर तालुक्यात १५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपरोक्त भागात पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
Excavation in Boisar East Violation of quarry rules in excavation Palghar news
बोईसर पूर्वेला बेसुमार उत्खनन; खोदकामात खदानी नियमांचे उल्लंघन
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Agriculture Minister Adv Manik Kokate blames that producer Herbicide company is responsible for loss of onion
कांद्याच्या नुकसानीला प्रथमदर्शनी उत्पादक कंपनी जबाबदार; कृषिमंत्र्यांचा ठपका
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?

हेही वाचा…साठवलेल्या खतांची जुन्या दरानेच विक्री- कृषिमंत्र्यांची सूचना

द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात ९६ हेक्टरवरील द्राक्षबागा, ४७ हेक्टरवरील गहू आणि २३ हेक्टरवरील कांदा रोपे असे एकूण १७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २३ गावातील ३०१ शेतकरी बाधित झाले. दिंडोरी, येवला आणि नाशिक तालुक्यातील हे नुकसान आहे. या पावसाने साखर उतरलेल्या द्राक्ष मण्यांना (तयार झालेल्या बागा) तडे जाण्याची भीती आहे. काही भागात हंगामपूर्व द्राक्षांची काढणी सुरू आहे. मण्यांमध्ये साखर उतरलेल्या द्राक्षांवर पाण्याचा थेंब पडला तरी तडे जातात. अशा द्राक्षबागांना अवकाळीची झळ बसणार असल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे नाशिक विभागीय मानद सचिव बबनराव भालेराव यांनी सांगितले.

Story img Loader