पनवेल: आमरण उपोषणाचा सहावा दिवस उलटला तरी राज्य सरकार लक्ष देत नसल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पोलीसांना साकडे घालून प्रतिघात्मक रास्तारोको १० मिनिटांसाठी करु देण्याचे आवाहन केले. सोमवारी दुपारी आंदोलकांनी ठरल्याप्रमाणे १५ मिनिटे गोवा मुंबई महामार्ग रोखला. काही मिनिटांत आंदोलनानंतर पुन्हा उपोषणठिकाणी शेतकरी एकवटले. या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार सिडको मंडळाचे काही अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले होते. २३ डिसेंबरनंतर या संदर्भात भेट लावू असे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले. मात्र आंदोलकांना दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारीच नागपूर आधिवेशनाच्या ठिकाणी विरोधी गटाच्या पक्षनेत्यांना भेटून येथील परिस्थिती सांगणार असल्याचे माजी आ. पाटील यांनी सांगीतले. मागील सहा दिवसांपासून आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलक संतापले असल्याचे माजी आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… नातेवाईकाची तब्येत पाहण्यासाठी आलेल्या महिलेचे चार लाखांचे दोन मंगळसूत्र चोरले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांनी पनवेल तालुक्यातील तुरमाळे गावाजसमोरील गोवा मुंबई महामार्गालगत मंडप उभारुन आमरण उपोषणासाठी ठाण मांडून बसले आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता रोखला मात्र काही मिनिटात रास्तारोकोतून माघार घेत शेतकऱ्यांनी वाहतूक खुली करण्यास पोलीसांना सहकार्य केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत हे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते.