उरण : अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत चिरनेरमध्ये आंबा पीक घेतले जात असून याच जंगलात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांची राख झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या झाडांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उरण तालुक्यातील वनसंपदाच्या रक्षणाकडे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे दुर्लक्ष यामुळे भूमाफियांनी डोंगर, माळरान परिसर पोखरण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. माती काढणे सोयीस्कर व्हावे, यासाठी जंगल परिसरात आगी लावण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारची आग चिरनेरच्या डोंगराला लागल्यामुळे आंब्याच्या फळांनी बहरलेली शेकडो झाडे जळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
Excavation in Boisar East Violation of quarry rules in excavation Palghar news
बोईसर पूर्वेला बेसुमार उत्खनन; खोदकामात खदानी नियमांचे उल्लंघन
mumbai scrap shops loksatta news
मुंबई : कुर्ला येथे भीषण आगीत भंगार दुकाने जळून खाक
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Fire at mahakumbh
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …

हेही वाचा…उरण : कोप्रोली आरोग्य केंद्रात रुग्णांची परवड

उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्याोगिकीकरणामुळे आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील भूमाफियांचा धंदा तेजीत आहे. तालुक्यातील उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. काही व्यावसायिकांनी डोंगर, माळरान परिसराला आगी लावण्यास सुरुवात केली आहे. डोंगरांना आगी लागण्याच्या घटनांमुळे डोंगरात वावरणाऱ्या पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

Story img Loader