नागपूर : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत ज्या कंपन्यांनी विदर्भात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार केले त्यापैकी तीन कंपन्या या महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना व औरंगाबाद येथील असल्याची माहिती उघड झाली आहे. या कंपन्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गुंतवणूक करणार आहेत हे येथे उल्लेखनीय.

डाव्होसमधील जागतिक परिषदेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ गेले होते. येथे विविध उद्योगांशी एक लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. त्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात २२ हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या तीन कंपन्यांचाही समावेश आहे.

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद

हेही वाचा – नागपूर : कारागृहातून सुटल्यानंतर अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र

अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून कोल गॅसीफिकेशन प्रकल्प उभारणीसाठी ( रोजगार १५ हजार), ब्रिटनच्या वरद फेरो ॲलॉईजने गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार २ हजार) उभारणीसाठी, तर इस्त्रायलच्या राजुरी स्टील्स ॲण्ड ॲलॉईजने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार) उभारण्यासाठी सामंजस्य करार दाओसमध्ये केले होते. मात्र, वरील तीनही कंपन्या महाराष्ट्रातील औरंगाबाद, चंद्रपूर आणि जालना येथील असल्याची बाब समोर आली आहे.

न्यू एज क्लिनटेक सोल्यूशन प्रा. लि. ही कंपनी इटखेडा, औरंगाबादची आहे. कंपनीची नोंदणी २ जून २०२२ रोजी झाली. या कंपनीचे संचालक गोपीनाथ लटपटे, बाळासाहेब दराडे आणि निहित अग्रवाल हे आहेत. फेरो अलॉय प्रा.लि. ही जालन्याची कंपनी आहे. या कंपनीची नोंदणी १७ जुलै २०१७ रोजी झाली आहे. कंपनीचे संचालक गौरव कासट आणि दीपेश माधनी हे आहेत.

हेही वाचा – पहिली बाजू: गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य

राजुरी स्टील अँड अलॉय इंडिया प्रा.लि. ही कंपनी चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. कंपनीची नोंदणी १२ जून २०१० रोजी झाली. त्याचे कार्यालय मुलुंड, पश्चिम मुंबई असे नमूद आहे. कंपनीच्या संचालक मोनिका जैन आणि विवेक बेरीवाल आहेत.