लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कसबा पेठेत दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ४३ गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

आणखी वाचा-पुणे: फुकटचा प्रवास महागात! रेल्वेने केली दीड कोटींची वसुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोळीप्रमुख तौफिक रियाज भोलावाले (वय २२, रा. कागदीपुरा, ८९६, कसबा पेठ), ऋतिक राजेश गायकवाड (वय २२), उजेर शाहिद शेख (वय २१), अरमान इक्बाल शेख (वय २०), रफिक जाफर शेख (वय ३५, सर्व रा. रियाज हाईट्स, मंगळवार पेठ) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. भोलावाले आणि साथीदारांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.