सामाजिक न्याय आंदोलनतर्फे २५ मे रोजी नवव्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून ग्रंथदिंडी, परिसंवाद, महाचर्चा, कविसंमेलन आणि पुरस्कार वितरण समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव गुरव असतील. ग्रंथदिंडी सकाळी ९ वाजता महानगरपालिकेतील महात्मा फुले पुतळ्यापासून निघणार आहे. या वेळी उपमहापौर दीपक मानकर आणि  डॉ. अनंत दीक्षित उपस्थित राहणार आहेत. ‘अण्णा भाऊंच्या साहित्यातील जग बदलाचे तत्त्वज्ञान’ या विषयावर परिसंवाद आणि ‘मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची गरज-एक मुक्त चिंतन’ या विषयावर महाचर्चा आयोजित केली आहे.