लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमजोर पडल्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून किमान तापमान होत असलेली घट थांबेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

How to Make Homemade Soup
पावसाळा स्पेशल: रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा चवदार हॉट वेज सूप; नक्की ट्राय करा
rain, Bhima Valley, Sahyadri Ghats,
सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पावसाचा जोर; उजनीत वाढतोय पाणीसाठा
Thane, garbage crisis, waste collection, water scarcity, monsoon, disease spread, landfill space, solid waste planning, waste transport, Daighar project, Ghodbunder, municipal corporation, public representatives, epidemic diseases, dengue, malaria, traffic congestion, solid waste plant, alternative site
ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे कचरा समस्या, वाहनांसह प्रकल्प बंद पडण्याबरोबरच कोंडीमुळे नियोजन बिघडल्याचा प्रशासनाचा दावा
severe waterlogging in mumbai in first rain
विश्लेषण : उपाययोजना करूनही पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची ‘तुंबई’ का झाली?
Zika virus cases rising in india
देशभरात झिका व्हायरसचा अलर्ट; हा विषाणू किती घातक? काय आहेत याची लक्षणं आणि बचावाचे उपाय?
prevent allergies this monsoon
“आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!” मान्सूनमध्ये ‘या’ सात पदार्थांचे सेवन करून संसर्ग टाळा
What do you do to prevent corrosion of a car Follow these tips
कारच्या गंज प्रतिबंधात्मक संरक्षणासाठी काय कराल? फॉलो करा ‘या’ टिप्स
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती

आणखी वाचा- पिंपरी- चिंचवड: ‘त्या’ नऊ निष्पाप जीवांचा बळी कुणी घेतला? पोलीस की महानगरपालिका..!

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसापासून राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात झपाट्याने घट होत होती. किमान तापमान सरासरी दोन ते चार अंश सेल्सिअसने घट झाल्यामुळे राज्यभरात हवेत गारवा जाणवत होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे तापमानात घट होत होती. आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाह कमजोर पडला आहे. तसेच दक्षिणेकडून किंवा आग्नेयकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवेत आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यभरात हवामान कोरडे राहणार असले तरीही किमान तापमानाचा पारा खाली जाणार नाही. तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.